अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती
सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सीसीआयकडून (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी बंद
असल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प दरात कापूस विकावा लागत आहे.
तसेच सोयाबीनला अवघा 4000 रुपयांपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मुख्य मागण्या
- महायुती सरकारने आश्वासित केलेली शेतकरी कर्जमाफी तात्काळ लागू करावी
- भावांतर योजना त्वरित अमलात आणावी
- कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यांची शासकीय खरेदी सुरू करावी
या मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून,
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Read more here : https://ajinkyabharat.com/bu-azmi-video-abu-azhmi-yanchaya-decorated-vidhanam-ufanar-c/