अविश्वास ठराव पारित ,समर्थकांकडून दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
मा.आमदार चैनसुख संचेती गटाने १३ विरूद्ध २ ने जिंकला अविश्वास ठराव
मलकापूर (स्वप्नील अकोटकर) –
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात २० मे रोजी
Related News
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
संचालकांनी अविश्वास ठरावाची मागणी केली होती. आज ३१ रोजी अविश्वास ठरावावरील प्रस्तावावर
विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाने हा ठराव जिंकला आहे.
संचेती गटाला १३ संचालकांनी पाठिंबा दिला. तर शिवचंद्र तायडे यांच्या बाजूने २ संचालक होते.
शिवचंद्र तायडे यांना आपले सभापती पद गमावावे लागले आहे.
सौम्य लाठीचार्ज व दगडफेक
अविश्वास ठराव सभेला आलेल्या संचालकांची गाडी अडवण्यात आली होती
यादरम्यान गर्दींना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला असून एका गटाने पोलिसांवरच दगडफेक केली.
तायडे व संचेती गट आमने सामने
यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तायडे व संचेती गट आमोरासमोर आले होते
यावेळी त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
144 कलम होती लागू
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काल रात्रीपासूनच 144 कलम लागू करण्यात आली होती
तरीसुद्धा संचेती व तायडे यांच्या समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मोठा पोलीस बंदोबस्त होता तैनात
कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज अविश्वास ठरावाची विशेष बैठक असल्याचे गांभीर्य लक्षात घेता
पोलिसांकडून वेगवेगळ्या पोलीस फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या यामुळे परिसराला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले होते.