अविश्वास ठराव पारित ,समर्थकांकडून दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
मा.आमदार चैनसुख संचेती गटाने १३ विरूद्ध २ ने जिंकला अविश्वास ठराव
मलकापूर (स्वप्नील अकोटकर) –
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात २० मे रोजी
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
संचालकांनी अविश्वास ठरावाची मागणी केली होती. आज ३१ रोजी अविश्वास ठरावावरील प्रस्तावावर
विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाने हा ठराव जिंकला आहे.
संचेती गटाला १३ संचालकांनी पाठिंबा दिला. तर शिवचंद्र तायडे यांच्या बाजूने २ संचालक होते.
शिवचंद्र तायडे यांना आपले सभापती पद गमावावे लागले आहे.
सौम्य लाठीचार्ज व दगडफेक
अविश्वास ठराव सभेला आलेल्या संचालकांची गाडी अडवण्यात आली होती
यादरम्यान गर्दींना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला असून एका गटाने पोलिसांवरच दगडफेक केली.
तायडे व संचेती गट आमने सामने
यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तायडे व संचेती गट आमोरासमोर आले होते
यावेळी त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
144 कलम होती लागू
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काल रात्रीपासूनच 144 कलम लागू करण्यात आली होती
तरीसुद्धा संचेती व तायडे यांच्या समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मोठा पोलीस बंदोबस्त होता तैनात
कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज अविश्वास ठरावाची विशेष बैठक असल्याचे गांभीर्य लक्षात घेता
पोलिसांकडून वेगवेगळ्या पोलीस फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या यामुळे परिसराला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले होते.