गृहमंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार बीएसएफ आणि सीआयएफमध्ये अग्निवीरांसाठी
१० टक्के आरक्षण आणि वयामध्ये सूट देण्यात येणार आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तसेच त्यांना शारीरिक दक्षता परीक्षेमध्येही सूट मिळणार आहे.
हा निर्णय दोन आठवड्यांपूर्वीच झाला होता; मात्र त्याची अधिकृत घोषणा काल केली गेली.
बीएसएफ आणि सीआयएसएफमध्ये आरक्षण लागू होईल,
त्यामुळे अग्निवीरांना सैन्यात काम करण्याची संधी मिळणार आहे.
अग्निवीर योजनेनुसार भारतीय सेना, नौदल, वायुदलमध्ये जवानांना भरती केले जाते.
भरती केलेल्यांपैकी ७५% जवानांना चार वर्षानंतर सेवामुक्त केले जाते
तर २५% जवानांना सैन्यामध्ये ठेवण्यात येते.
या उर्वरित ७५% सैनिकांसाठी बीएसएफ आणि सीआयएसएफच्या
१०% आरक्षणाचा लाभ होणार आहे.
या निर्णयासंबंधी डीजी बीएसएफ यांनी सांगितले की,
“अग्निवीरांना १०% आरक्षण आणि वयासंबंधी सूट मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या
नेतृत्वाखाली आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निर्णयामुळे
फोर्स अजून मजबूत होणार आहे.”
गृहमंत्रालयाच्या या निर्णायावर डीजी सीआयएसएफ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
अग्निवीरांना हवालदारपदासाठी १० % आरक्षण दिले असून
त्यासोबतच शारीरिक दक्षता परीक्षेत सूट देण्यात आली आहे.
२०२२ मध्ये मोदी सरकारकडून अग्निवीर योजना सुरु केली गेली
त्यावेळी या योजनेचा प्रंचड विरोध केला गेला.
सैन्याच्या भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांनी रस्त्यावर उतरत याचा निषेध केला होता.
तत्कालिन लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही या योजनेला विरोध होता.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अग्नीवीर योजनेचा प्रंचड विरोध करत आहेत.
त्यांनी लोकसभेच्या प्रचारामध्येही जर इंडिया आघाडी सत्तेत आली तर
अग्नीवीर योजना रद्द करणार असे सांगितले होते.
त्यांनी संसदेमध्येही अग्निवीरांच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरले होते.
मात्र या १०% आरक्षणामुळे सरकारचा अग्निवीर योजना सुरु ठेवण्याचा मानस आहे
हे दिसते आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/akher-mp-nilesh-lankens-nutrition-demand-on-the-fourth-day/