समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले.
यावरुन आता विधीमंडळामध्ये एकमताने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मोठी घडामोड घडत आहे.
Related News
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! जुजबी मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून 1 वर्षाची मुदत
पावसाळ्यात जुलाबाचा धोका वाढतोय; ‘या’ 7 टिप्स फॉलो करा अन् अतिसारापासून स्वतःचा बचाव करा!
IND vs SL 2nd Test: फॉलोऑन देऊनही भारताला विजय नाही; श्रीलंकेने सामना वाचवला!
MPSC Paper Leak : आदर्श शिक्षक ते पेपरफुटीचा आरोपी; अमृत पाटील यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर
Kriti Sanon : कृती सेनॉनच्या ‘राखी’ जाहिरातीवरून वाद; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट व्हायरल
समय रैनाची मुख्यमंत्र्यांसमोर टोलेबाजी; ‘सकाळी घरातून उठवलं, पण यावेळी सन्मान झाला’, फडणवीसांनाही हसू अनावर!
फरशीवरील हट्टी डाग निघत नाहीत? हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा आहे जबरदस्त!
शरीरातील ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; B12 ची कमतरता तर नाही ना?
तिबेटमध्ये कैलास यात्रेकरूंवर काळाचा घाला! ईशा फाउंडेशनचे 80 भक्त बेपत्ता; सद्गुरूंची चीनकडे मोठी मागणी
दहाव्या मजल्यावरून उडी घेतली अन् झाडाला अडकली; 4 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या महिलेचा जीव थोडक्यात वाचला
अनन्या पांडेचं ब्रेकअप? वॉकर ब्लँकोसोबत 2 वर्षांचं नातं अखेर संपलं; नेमकं काय घडलं?
वजन कमी करायचंय? दिवसाला किती पोळ्या आणि किती भात खावा? जाणून घ्या योग्य प्रमाण
समाजवादी पक्षाचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले आहे.
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करणारे वक्तव्य केले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील जोरदार टीका केली होती.
भाजपा आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील अबू आझमी यांना निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला.
हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे अबू आझमी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निलंबित असणार आहेत.
औरंगजेबाचे उदात्तीकरण प्रकरण हे अबू आझमी यांना भोवले आहेे.
काय म्हणाले होते अबू आझमी?
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले. ते म्हणाले की,
“देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे.
औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता.
त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले.
यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादाला तोंड फुटले आहे.
अबू आझमी यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.
मात्र त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या एकमताने अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं आहे?
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले.
यामुळे विधीमंडळामध्ये त्यांच्या निलंबनासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला.
भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव ठेवला. यावेळी ते म्हणाले की,
अध्यक्ष महोदय मी असा प्रस्ताव मांडतो की अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता
असं त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
ही त्यांची वक्तव्यं आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्यं निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे.
अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे ही विधानसभा असा ठराव करते आहे की अबू
आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबन करावे, असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला.

