समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले.
यावरुन आता विधीमंडळामध्ये एकमताने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मोठी घडामोड घडत आहे.
Related News
बनावट आधारकार्डावर बालविवाह करण्याचा प्रयत्न फसला
इराणचा प्रिन्स सुलतान एअरबेसवर धक्कादायक हल्ला, अमेरिकन AWACS विमान नष्ट
उत्तर कोरियाने यशस्वी केली सुपर पावर मिसाइल, अमेरिकेचे टेन्शन वाढले
अकोल्यात पाल्म संडे भक्तिभावाने साजरा, झावळ्यांची दिंडी झाली ठिकठिकाणी
काळ्या प्लास्टिकच्या डब्यातील जेवण: आरोग्यासाठी घातक, मृत्यूचा धोका?
अमेरिकेने इराणमध्ये पाठवले 3500 सैनिक; युद्धाची शक्यता वाढली
इराण युद्धाचा मोठा फटका: चार दिवसात 7 कंपन्यांचे 1.75 लाख कोटींचे नुकसान
इराण युद्धाचा पाकिस्तानवर फटका; पीआयए उड्डाण थांबवण्याच्या मार्गावर
MI vs KKR: मुंबईने टॉस जिंकला, केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं
इराण युद्धामुळे पाकिस्तानमध्ये उर्जा संकट; स्मार्ट लॉकडाऊनचा धोका
इराणने युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसोबत मांडली ‘सशर्त सहमती’ – होर्मुझवर नियंत्रण हवे
महावितरणचा थकबाकीदारांवर ‘हाय व्होल्टेज’ शॉक – नागपूर जिल्ह्यात वीज कट कारवाई
समाजवादी पक्षाचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले आहे.
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करणारे वक्तव्य केले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील जोरदार टीका केली होती.
भाजपा आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील अबू आझमी यांना निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला.
हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे अबू आझमी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निलंबित असणार आहेत.
औरंगजेबाचे उदात्तीकरण प्रकरण हे अबू आझमी यांना भोवले आहेे.
काय म्हणाले होते अबू आझमी?
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले. ते म्हणाले की,
“देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे.
औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता.
त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले.
यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादाला तोंड फुटले आहे.
अबू आझमी यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.
मात्र त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या एकमताने अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं आहे?
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले.
यामुळे विधीमंडळामध्ये त्यांच्या निलंबनासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला.
भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव ठेवला. यावेळी ते म्हणाले की,
अध्यक्ष महोदय मी असा प्रस्ताव मांडतो की अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब उत्तम प्रशासक होता
असं त्याची भलामण करणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
ही त्यांची वक्तव्यं आक्षेपार्ह आहेत. त्यांची वक्तव्यं निषेधार्ह आहेत. यामुळे सभागृहाचा अपमान झाला आहे.
अबू आझमींनी विधानसभेची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे ही विधानसभा असा ठराव करते आहे की अबू
आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत निलंबन करावे, असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला.
