विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी होत असलेल्या
निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह महायुती व महविकास आघाडीचे
एकूण १४ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
महायुतीकडून भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार परिणय फुके,
सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर
यांना उमेदवारी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी खासदार भावना गवळी
व माजी खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे तसेच राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाने प्रज्ञा राजीव सातव यांना
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना समर्थन दिले आहे
तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक
शिवसेना सचिव क्रिकेट बोर्डाचे सदस्य मिलिंद नार्वेकर
यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे
महायुती आणि महाविकास आघाडीचे विधानसभेतील एकूण संख्याबळ लक्षात घेता
महायुतीला धोका नाही मात्र.
नार्वेकर व जयंत पाटील यांच्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व उमेदवारांसह अरुण जगताप आणि अजय सेंगर
या अपक्ष उमेदवारांनीही आज आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
प्रत्येक उमेदवारासाठी १० आमदारांची प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी आवश्यक असते.
उद्या बुधवारी या सर्व अर्जाची छाननी होणार असून या छाननीत दोन अपक्षांचे अर्ज बाद होतील
नार्वेकर यांनी माघार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल,
मात्र उमेदवारी कायम ठेवल्यास ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात राहतील
आणि त्यामुळे निवडणूक अटळ राहील मात्र संख्येची जुळवाजुळव करण्यासाठी
शिवसेनेला व जयंत पाटील याना या निवडणुकीत कसरत करावी लागणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/there-is-a-fight-between-biden-and-trump-in-the-us-presidential-election/