दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोक घाबरून घराबाहेर, इमारतींखाली रस्त्यावर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
देशाची राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला.
Related News
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,
विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपच...
Continue reading
अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.
त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांप...
Continue reading
अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमात...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
बोर्डी गावातील आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या
नाल्यांची दीर्घकाळपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्याव...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल...
Continue reading
पुणे |
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी गुणवंत विद्यार...
Continue reading
सोमवारी पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले आहेत.
या भूकंपाची तीव्रता 4.3 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
यामुळे दिल्लीतील जनता साखर झोपेत असताना अनेकजण खडबडून जागे झाले.
यामुळे दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पहाटे ५.३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
याचे केंद्र दिल्लीच्या जवळच जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर होते.
हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला.
तात्काळ घराबाहेर पडण्यास सुरुवात
दिल्लीत अचानक झालेल्या या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहाटे साखरझोपेत असताना अचानक जमीन हलत असल्याचे जाणवण्यास सुरुवात झाली.
यानंतर दिल्लीकरांनी खबरदारी म्हणून तात्काळ घराबाहेर पडण्यास सुरुवात केली.
दिल्ली-एनसीआरसह शेजारील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.
कोणतीही जीवितहानी नाही
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र दुर्गाबाई देशमुख विशेष शिक्षण महाविद्यालयाजवळील धौला कुआं या ठिकाणी होते.
पहाटे ५:३६ वाजता झालेला हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर होता.
सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दर 2 ते 3 वर्षांनी भूकंप
नवी दिल्लीतील हा भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या भागाजवळ एक तलाव आहे.
या ठिकाणी दर दोन ते तीन वर्षांनी भूकंप होतात. एका अधिकाऱ्याने सांगितले की, २०१५ मध्येही या भागात ३.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता.
या भूकंपामुळे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक उंच इमारतीमधील लोक घराबाहेर पडले.
दिल्ली पोलिसांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आम्हाला आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित असाल. आपत्कालीन परिस्थितीत ११२ हेल्पलाइनवर कॉल करा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/me-gabarlo-hoto-mhanoon-raatri-1-vajta-phone-devhayat-sanwala/