डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ संपन्नराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे कृषी पदवीधरांना मार्गदर्शन
अकोला, दि. ५ – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ आज भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
या समारंभात ४,०४० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण,
तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य
आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, “ज्ञान मिळवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी नव्या पदवीधरांनी
जबाबदारी घेतली पाहिजे.” त्यांनी विद्यापीठाच्या बीजनिर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प अशा विविध उपक्रमांचे कौतुक केले.
कृषी मंत्री कोकाटे यांनी ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाच्या शेतीतील महत्त्वावर भर दिला. त्यांनी सांगितले की, ”
उत्पादनखर्च कमी करत उत्पन्न वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.”
यावेळी अशोक दलवाई यांनी कृषी संशोधनाची दिशा पर्यावरण संवर्धक असावी,
असे मत व्यक्त करत शाश्वत विकासासाठी जैवविविधता जतन, मृद व जलसंवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली.
या कार्यक्रमात कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकीसह विविध शाखांमधील २५ विद्यार्थ्यांना पीएच.डी.
पदवी प्रदान करण्यात आली. कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
READ MORE : https://ajinkyabharat.com/ya-deshchaya-netyavar-trump-yancha/