अकोला: शेतमालाला योग्य हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या
अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्यात आले.
Related News
6 खास फोटोंमध्ये पाहा! खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सुनबाई वैष्णवी महाडिक यांचा मनमोहक वाढदिवसाचा रॉयल लूक
मोर्णा नदीतील जलपर्णीच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
TET Paper Leak 2026: 6 लाख उमेदवारांना मोठा धक्का! दीड कोटींचा पेपरफुटी रॅकेट उघड, भिवंडीत 3 उच्चशिक्षित आरोपी अटकेत
9 भन्नाट मराठी नावांनी FIFA World Cup गाजवला! रोनाल्डोपासून मेस्सीपर्यंत फुटबॉलपटूंचे मराठमोळे अवतार
रेशन कार्डधारकांसाठी 10 महत्त्वाच्या गोष्टी! e-KYC अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा प्रक्रिया
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: 5 जणांचा जागीच मृत्यू, एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत; अपघातामागील 7 धक्कादायक बाबी
NMMT ताफ्यात वर्षभरात 150 बस दाखल
भूकंपाचा भीषण कहर! अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटू लुकास ट्रेजोच्या पत्नीसह 2 मुलांचा पत्ता नाही
7 मनमोहक क्षण! मुंबईच्या आकाशात झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य, मरीन ड्राइव्हवर निसर्गाची अद्भुत जादू
IND vs IRE: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर 10 भन्नाट Memes व्हायरल! श्रेयस अय्यरवर संतप्त चाहत्यांचा जोरदार निशाणा
24 जूनच्या वादळाने उडवले घराचे छप्पर; अकोल्यातील बाहेकर कुटुंब उघड्यावर
हुबेहूब रुपाली चाकणकरच… दीपाली सय्यदचा जबरदस्त लूक सोशल मीडियावर व्हायरल ; 5 फोटोत पाहा!
या आंदोलनात शेतकऱ्यांनी रात्रभर भजन म्हणत सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतमाल हमीभाव कायदा त्वरित लागू करावा.
- सरसकट कर्जमुक्ती द्यावी.
- सोयाबीन – ₹6,000, हरभरा – ₹8,000, कापूस – ₹10,000, तूर – ₹12,000 प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा.
- स्वामिनाथन आयोग लागू करावा.
- पीक कर्जावर (CIBIL) अट लागू करू नये.
- कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने करावा.
- रब्बी व खरीप हंगामासाठी प्रती एकर ₹40,000 अनुदान द्यावे.
- कृषी साहित्यावरील जीएसटी (GST) रद्द करावी.
रात्रभर सुरू राहिले आंदोलन
हे आंदोलन रात्री १० वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कीर्तन व भजन गात आपला आवाज बुलंद केला.
मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
सरकारला इशारा
या आंदोलनामुळे सरकारची झोप उडावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा,
हा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सरकारने तातडीने
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/gold-and-silver-sparkle-mahagaichi-tutari/

