अकोला, दि. २७: अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क
चौकामध्ये काल मध्यरात्री चारचाकी वाहन पलटी झाल्याची घटना घडली.
या अपघातात तीन जण जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
अमरावतीकडून अशोक वाटिकाकडे जात असताना वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी
नेहरू पार्क चौकामध्ये विद्युत खांबाला धडकली.
जोरदार धडकेमुळे गाडी पलटी झाली आणि विद्युत खांब मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाला.
अपघातामुळे या भागातील विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता.
संबंधित विभागाने तातडीने विद्युत खांब दुरुस्तीसाठी काम सुरू केले असून, पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
अपघातात जखमी झालेल्या तिघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुदैवाने जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समजते.
या घटनेचा तपास खदान पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
गाडी चालकाचे नियंत्रण कसे सुटले, याबाबत चौकशी सुरू असून,
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
या घटनेमुळे नेहरू पार्क चौक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
रहदारी व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने तातडीने परिस्थिती आटोक्यात आणली.
या अपघातामुळे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचे कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नागरिकांना वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatiyal-balapur-basasthanakawar-chhatrapati-sambhajinagar-navawar-kali-shai-lavanyons-anti/