वाडेगाव येथील नदीपात्रात असलेला कोल्हापूरी बंधारा सध्या ओसंडून वाहत असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे आणि वरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहामुळे जलसाठा भरपूर प्रमाणात आहे.
Related News
ड्रोनच्या नजरेतून ‘ऑपरेशन क्लीन’
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
खडकीत माणुसकीचं दर्शन:
गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण:
पाकिस्तानच्या हाती असलेले अण्वस्त्र सुरक्षित आहेत का?
भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या-चिंध्या…
“परी आहे मी”… अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस अंदाज!
IPL 2025: किती परदेशी खेळाडू IPL साठी परत येणार?
जगातील सर्वात गरीब राष्ट्रपती, कधीच राष्ट्रपती भवनात राहिले नाहीत…
चाकणमध्ये महिलेला फरफटत निर्जनस्थळी नेऊन बलात्कार;
जम्मू-कश्मीरमध्ये ‘शोधून शोधून ठोकलं’;
छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडेखोरांचा कहर:
याचा लाभ परिसरातील सिंचन विहिरींना व कूपनलिकांना होत असल्याने बागायती क्षेत्रासाठीही हा पाणीपुरवठा फायदेशीर ठरत आहे.
बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होत असल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. जलसाठा शंभर टक्के
भरल्याने सध्या बंधारा ओसंडून वाहत आहे, आणि त्यामुळे परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होत आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी बंधाऱ्याचे गेट अज्ञात व्यक्तींनी काढल्याने बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ५०% खाली आली होती.
मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे गेट पुन्हा लावण्यात आले आणि सध्याच्या परिस्थितीत बंधाऱ्यात पाणी पूर्ण क्षमतेने साठवले गेले आहे.
वाडेगाव आणि आसपासच्या गावांमध्ये बंधाऱ्याचा जलसाठा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
त्यामुळे या बंधाऱ्याच्या योग्य देखभालीसाठी स्थानिक प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/shri-rishi-maharaj-yatra-mahotsav-at-patur-nandapur-13-january-2025/