प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने पीपीएसची परीक्षा पुढे ढकलली
आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर हल्लाबोल
केला आहे. योगी सरकार तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू इच्छित
आहे, असे प्रियंका गांधी यांन म्हटले आहे. यासंदर्भात प्रियांका
गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, यूपी पीसीएस प्रिलिम्सची
परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यूपी टेक्निकल
एज्युकेशन सर्व्हिसेस-२०२१ च्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या
आहेत. तसेच, वारंवार परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटी आणि
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणे, हे
भाजप सरकारचे धोरण बनले आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
याचबरोबर, प्रियांका गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून
भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, “स्पर्धक विद्यार्थीही
यूपीपीसीएस परीक्षा दोन दिवसांत घेण्याच्या प्रस्तावाला विरोध
करत आहेत.
त्यांचा युक्तिवाद बरोबर आहे की, हीच परीक्षा दोन दिवसांत
घेतली, तर नॉर्मसाइजेशनच्या नावाखाली पुन्हा स्केलिंगचा खेळ
सुरू होईल. एकीकडे भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे,
नोकऱ्या न देऊन मागासवर्गीय, दलित आणि वंचितांचा
आरक्षणाचा अधिकारही हिरावून घेत आहे. “दरम्यान, उत्तर प्रदेश
लोकसेवा आयोगाने प्रांतीय नागरी सेवा प्राथमिक परीक्षा अनिश्चित
काळासाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. परीक्षा पुढे
ढकलण्याची यंदाची ही दुसरी वेळ आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/beneficiaries-of-adkale-government-scheme-with-code-of-conduct/