नवीन सरकार स्थापन होईपर्यंत प्रतीक्षा
जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांनी
शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज दाखल केले होते. बहुचर्चित
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
लाडक्या बहिणींसह विविध योजनांचा पात्र अर्जदारांना लाभही
मिळाला. मात्र, मंगळवारी (दि. १५) निवडणूक आचारसंहिता
लागल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही थांबवली. त्यामुळे
आता नवीन सरकार स्थापन होईपर्यंत अर्जदारांना प्रतीक्षा करावी
लागणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता
लागू झाल्याने आंदोलन व मोर्चावर निर्बंध आले. सार्वजनिक
ठिकाणे, धरणे, आंदोलने, निदर्शने व उपोषण करण्यास आले.
प्रतिबंध घालण्यात समाजकल्याणच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम
कामगारांची नोंदणी सुरू होती. १४ ऑक्टोबरपर्यंत सहायक
कामगार आयुक्त कार्यालयात जिल्हाभरातील कामगारांची प्रचंड
गर्दी दिसून आली. मात्र, हजारो कामगारांची नोंद होऊ शकली
नाही. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ही नोंदणी
थांबविण्यात आली. कामगारांना देण्यात येणारी संसारोपयोगी
भांडी व बोनसही थांबला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी
नव्याने अर्ज स्वीकारणे आता बंद करण्यात आले आहे. यापूर्वी
मंजूर झालेल्या लाभार्थीना नोव्हेंबर अखेरचे मानधन देण्यात आले
आहे. अर्ज करण्याचे पोर्टल बंद झाले. जिल्हातील हजारो पात्र
लाभार्थी बहिणींना अर्ज करण्यासाठी राज्यातील नवीन सरकारची
वाट पाहावी लागणार आहे. बांधकाम कामगार योजनेसाठी नव्याने
अर्ज करण्याचे मार्ग बंद झाले. त्यांना देण्यात येणारी भांडी व
दिवाळी बोनस वितरणही थांबवण्यात आला. वयोश्री व तीर्थदर्शन
योजनेलाही ब्रेक लागला. व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना
तात्पूरत्या बंद झाल्या. काही योजनांचा लाभ सुरू ठेवण्याबाबत
जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविणार
असल्याची माहिती सूत्राने दिली.
Read also:https://ajinkyabharat.com/mla-satish-chavan-suspended-for-6-years-for-anti-party-activities/