गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त
विधानपरिषद आमदारकांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल
नियुक्ती आमदार म्हणून 12 पैकी 7 नेत्यांची वर्णी लागली आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी दुपारी 12
वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. या सात
जणांमध्ये अजित पवार गटाकडून नेते आणि छगन भुजबळ यांचे
पूत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली. तर शिंदे गटाच्या नेत्या
आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांनी शपथ घेतली. आता
यावर अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षाने नाराजी व्यक्त केली
आहे. यामुळे शहराध्यक्षासह तब्बल 600 जणांनी राजीनामा दिला
आहे. अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर हे नाराज
झाले आहेत. राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी न दिल्याने
त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, त्यांच्यासोबत पुणे
शहरातील अजित पवार गटाच्या तब्बल 600 जणांनी राजीनामा
दिला आहे. नुकतंच याबद्दल अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक
मानकर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली.
मी 2012 पासून पक्षाचं काम करतोय. गेले 14 महिने शहर
अध्यक्ष म्हणून काम करतोय. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून
संधी मिळावी, अशी मागणी पदाधिकारी यांनी केली होती. पंकज
भुजबळ, इद्रिस नाईकवडे यांना संधी दिली. मग मला नाकारण्याचं
कारण काय? मला इतर माणसासारखं पुढे पुढे करता येत नाही.
कार्यकर्त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले आहेत. मी स्वतः राजीनामा
देतो. कार्यकर्त्यांनी राजीनामा माघारी घ्यावे. सुनील तटकरे यांनी
रुपाली चाकणकरांबद्दल तत्परता दाखवली. ती आमच्याबद्दल का
दाखवली नाही? असा प्रश्नही दीपक मानकर यांनी उपस्थित केला
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/indias-foreign-minister-jaishankar-pakistan/