पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी
उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे.
रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजिक
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा हे
त्यांच्या साधेपणा आणि दानशूर स्वभावामुळे सर्वसामान्यांमध्ये
जास्त प्रचलित होते. भारताला जेव्हा जेव्हा कठीण काळात
मदतीची गरज लागली तेव्हा रतन टाटा यांनी सढळ हातांनी
मदत केली. रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला फक्त यशाच्या
सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं नाही तर त्यांनी माणुसकीदेखील
जोपासली. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. अनेक
सामाजिक संघटनांना आर्थिक मदत केली. अनेक सामाजिक
संघटनांसोबत ते जोडले गेले. त्यामुळे देशभरात रतन टाटा यांचं
आदराने नाव घेतलं जातं. रतन टाटा यांच्या निधननंतर संपूर्ण देश
शोकसागरात बुडाला आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची
मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न
पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी
पत्राद्वारे केली आहे. तसेच भारतरत्न पुरस्कार हा हयात असतानाच
देण्यात यायला हवा. या विषयी काही निश्चित धोरण असणं
आवश्यक आहे. आपण ते आखाल याची आपल्याला खात्री आहे,
असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.