काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत
वक्तव्य केल्यानंतर आज राज्यभर भाजपकडून आंदोलन करण्यात
येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर यांसह संपूर्ण महाराष्ट्रात
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात
मोठ्या घोषणाबाजीही करण्यात आल्या. मुंबईत घाटकोपर परिसरात
भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार
यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी राहुल
गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी, अन्यथा आमचे आंदोलन सुरुच
राहील, अशी मागणी केली. पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांनी घाटकोपर
मधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात आंदोलन केले. यावेळी राहुल गांधींनी
केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला. “आम्ही राहुल गांधींचा धिक्कार
आणि निषेध करतो. राहुल गांधी हे जोपर्यंत माफी मागत नाही, तोवर आमचे आंदोलन
सुरु राहील. त्यांनी आपल्या संविधनाचा अपमान केला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी
स्पष्टीकरण द्यायला हवं. राहुल गांधी यांच्या विधानाचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी
महाराज यांचा पुतळा पडला, तेव्हा मोदींनी माफी मागितली, आता राहुल गांधी यांनी
संविधानाचा अपमान केला आहे, त्याची त्यांनी माफी मागावी. यावर मनोज जरांगे काय
बोलतात, त्यासाठी मी उत्सुक आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-leader-nitish-ranes-controversial-legislation-to-treat-only-hindus/