26 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट
किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
कोसळला. दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले
होते. तसेच, शिवभाक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याने संतापाची
लाट उसळली होती. दरम्यान या प्रकरणी शिवरायांच्या पुतळ्याचा
शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली. पोलिस
जयदीप आपटेची कसून चौकशी करत आहेत. यानंतर आता
सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री दिपक केसरकर
यांनी 100 कोटींचा प्रस्ताव ठेवला आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नवा पुतळा उभारण्यात येणार आहे.
पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी 100 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे
ठेवला आहे. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकीय आरोप-
प्रत्यारोप सुरू आहेत. लोकसभेत मतं मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र
मोदींनी घाईघाईने पुतळ्याचं उद्घाटन, असा आरोप खासदार संजय राऊतांनी
केलाय. दरम्यान, शिवरायांचा पुतळा उभारून पुन्हा पंतप्रधान मोदींना
उद्घाटनासाठी बोलावणार, असं उत्तर मंत्री दीपक केसरकरांनी संजय
राऊतांना दिलंय. तर पुन्हा पुतळा उभारू देणार नाही, असा इशारा ठाकरे
गटाचे नेते विनायक राऊतांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/chemical-air-fault-in-ambernath-morivali-midc-area/