अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण
संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना
Related News
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष
गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेविरोधात एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने
...
Continue reading
पातूर : तालुक्यातील ग्रामपंचायत बोडखा (चिंचखेड) मध्ये १५ वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करून
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.राज बोरकर यांनी केला आह...
Continue reading
अकोला शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी अकोल्यात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
विश...
Continue reading
अकोट शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
केवळ “मुलाकडे आई अधिक लक्ष देते” या कारणावरून एका ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा निर्दय खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समो...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,
विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपच...
Continue reading
अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.
त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांप...
Continue reading
अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमात...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले...
Continue reading
संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जोपर्यंत सूर्य-चंद्र
आहे, तोपर्यंत भारताचे संविधान राहील. संविधानाने दिलेले आरक्षण राहील.
आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र
निषेध करतो, असे सांगत खबरदार आरक्षण संपविण्याची भाषा कराल तर
असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य
मंत्री ना रामदास आठवले यांनी दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राहुल गांधी
यांच्याविरुद्ध राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रामदास
आठवले यांनी दिली. १३ सप्टेंबर रोजी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने
आझाद मैदान मुंबई येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात
येणार आहे, असे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी सांगितले. सामाजिक दृष्ट्या
भारतात सामंजस्य निर्माण झाल्यानंतर सामाजिक आरक्षण संपवण्याचा निर्णय
काँग्रेस घेईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे.
या वक्तव्यातून राहुल गांधींनी काँग्रेस ही आरक्षण विरोधी असल्याचेच उघड केले आहे.
काँग्रेस सर्वाधिक काळ देशात सत्तेत राहिली आहे. त्यांच्या काळात दलितांवर अधिक
अत्याचार झाले आहेत. दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले
आरक्षण हे त्यांचे कवच कुंडल आहे. आरक्षण संपविण्याची भाषा करण्याची राहुल
गांधीना गरज काय होती, अशी विचारणा रामदास आठवले यांनी केली.
दरम्यान, आरक्षण संपविण्याचा भाषा करणाऱ्या राहुल गांधींना दलित आदिवसी
मागासवर्गीय धडा शिकवतील. परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे
हे काँग्रेस नेते राहुल गांधींचे उद्योग आहेत. भारतात लोकतंत्र नाही, असे परदेशात
जाऊन बरळणे चूक आहे. लोकशाही आणि आरक्षणबाबत परदेशात जाऊन चुकीची
वक्तव्य करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही तीव्र निषेध करतो,
अशी टीका आठवले यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/major-accident-due-to-rain-in-datia/