मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे.
जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा
मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जिरीबाम येथे आज
Related News
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
सकाळी (7 सप्टेंबर) ताज्या हिंसाचारात 5 लोकांचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, एका व्यक्तीची झोपलेला
असताना गोळी झाडून हत्या करण्यात आली. दोन सशस्त्र विरोधी
गटांनी परस्परांवर गोळ्या चालवल्या. यात 4 जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी जिल्ह्या मुख्यालयापासून
5 किमी अंतरावर एका निर्जन स्थळी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीची
घरात घुसून हत्या केली. त्यावेळी तो झोपलेला होता. या हत्येनंतर
7 किलोमीटर दूर डोंगरांमध्ये सशस्त्र गटात जोरदार गोळीबार झाला.
यात 4 जणांचा मृत्यू झाला.
या आठवड्याच्या सुरुवातीला जाळपोळीची सुद्धा घटना घडली होती.
काही लोकांनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच रिकामी असलेलं 3 खोल्यांच
घर जाळलं होतं. 1 ऑगस्टला आसाच्या कछारमध्ये CRPF च्या
देखरेखीखाली एक बैठक झाली. दोन वेगवेगळ्या समुदायाच्या
प्रतिनिधींनी सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी जाळपोळ,
गोळीबार रोखण्यासाठी करार केला. त्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार झालाय.
Read also: https://ajinkyabharat.com/uddhav-thackerays-family-lalbaugcha-rajas-darshanala/