नदी घाटावरील गुप्त कारवाईची गरज – टाकळी बु.अवैध रेती राज

नदी घाटा

अकोट तालुक्यातील टाकळी बु परिसरात रेती तस्करीची घटना गंभीर बनली आहे. मागील महिनाभरात नदी पात्रातील घाटावर रेती तस्करांनी महसूल प्रशासनाच्या नाकावर निंबू टाकून, मोठ्या प्रमाणात अवैध रस्त्यांचा वापर करून रात्रीच्या सुमारास शेकडो ब्रास रेती उपसून शासनाचा महसूल बुडविला आहे. स्थानिक महसूल प्रशासनाने फक्त रस्त्यावर खड्डे खोदून पर्यावरणाचे रक्षण केल्याचा दिखावा केला; मात्र नागरिकांच्या मते ही कारवाई अपुर्या ठरली आहे.

स्थानिक नागरिकांच्या भावना पाहता, प्रशासनाकडून सर्जिकल स्ट्राईक (धडक कारवाई) करण्याची गरज आहे. जेव्हा तस्कर जेसीबी आणि इतर यंत्रसाधनांच्या साहाय्याने मोठे रस्ते बनवून शेकडो ब्रास रेती चोरी करतात, तेव्हा रात्री खड्डे बुजवून आणखी रेती उपसा केली जाते. यामुळे ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजामुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांची झोप बाधित होत आहे.

टाकळी बु परिसरातील नदी घाटावर यावर्षी अद्याप अधिकृत लिलाव झाला नसतानाही अवैध रेती उपसा होत असल्याने महसूल प्रशासनावर संगणमताचे आरोप होत आहेत. नदीपात्राची खोली अनियंत्रित वाढल्याने जलस्त्रोत धोक्यात आले आहेत, आणि ओव्हरलोड वाहनांमुळे ग्रामीण रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल माफियांच्या खिशात जात आहे.

Related News

स्थानीय प्रशासनाने महसूल, पोलीस आणि आरटीओ यांचे संयुक्त पथक तयार करून रात्रीची गस्त वाढवणे आवश्यक आहे. फक्त दंड न आकारता, तस्करी करणाऱ्या वाहनांवर कायमस्वरूपी जप्तीसारखी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच, नदीपात्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. फक्त ट्रक चालकांवर कारवाई न करता, मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना याकडे विशेष लक्ष देऊन भरारी पथके तैनात करावी लागेल. स्थानिक महसूल कर्मचारी गस्तवर असतानाही तस्करांना अधिकारी घाटावर पोहचण्यापूर्वी माहिती मिळते, त्यामुळे ते पसार होतात. यामुळे गुप्त आणि वेगवान सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करणे गरजेचे ठरते, ज्यामुळे रेती माफियांना वेसन घालता येईल. 

read also : https://ajinkyabharat.com/shocking-suicide-of-a-student-of-trimbakeshwar-pimpri-area-mourning-in-the-area/  

Related News