राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने जातीय जनगणना आणि महिला
सुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.
समाजाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीय
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
जनगणनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली आहे.
तर महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त
केली आहे. या विषयावर केरळच्या बैठकीत चर्चा करण्यात आली
आहे. तसेच इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली असून महत्त्वाचे
निर्णय घेण्यात आले आहेत. जातीनिहाय जनगणना हा संवेदनशील
मुद्दा असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. जातीय
जनगणनानेमुळे समाजाच्या एकता आणि अखंडतेला धोका आहे,
असं संघाने म्हटलं आहे. तसेच समरसतेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं
काम नेटानं पुढे नेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
दलित समाजाची लोकसंख्या जाणून घेण्यासाठी सरकारने त्यांची
जनगणना केली पाहिजे, असं संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील
आम्बेकर यांनी म्हटलं आहे. या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या
दुर्देवी घटनेवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. यावेळी महिलांच्या
सुरक्षेसाठी कायद्यातील दुरुस्तीवर संघाने यावेळी जोर दिला.
गेल्यावर्षी संघाने राज्य आणि जिल्ह्यात 472 महिला संमेलनाचं आयोजन
करण्यात आलं होतं. त्यात स्त्रीयांचे मुद्दे, पाश्चात्य स्त्रीवाद आणि भारतीय
चिंतन यावर चर्चा करण्यात आली. बंगाल, वायनाड आणि तामिळनाडूतील
घटनांवर या बैठकीत गंभीरपणे चर्चा करण्यता आली. संघाने अहिल्याबाई
होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर सामाजिक परिवर्तनासाठी
काम करण्याची योजना आखण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/howl-of-rain-in-nanded-gavanna-purcha-vedha/