राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने जातीय जनगणना आणि महिला
सुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.
समाजाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीय
Related News
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
जनगणनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली आहे.
तर महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त
केली आहे. या विषयावर केरळच्या बैठकीत चर्चा करण्यात आली
आहे. तसेच इतर मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली असून महत्त्वाचे
निर्णय घेण्यात आले आहेत. जातीनिहाय जनगणना हा संवेदनशील
मुद्दा असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. जातीय
जनगणनानेमुळे समाजाच्या एकता आणि अखंडतेला धोका आहे,
असं संघाने म्हटलं आहे. तसेच समरसतेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं
काम नेटानं पुढे नेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
दलित समाजाची लोकसंख्या जाणून घेण्यासाठी सरकारने त्यांची
जनगणना केली पाहिजे, असं संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील
आम्बेकर यांनी म्हटलं आहे. या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या
दुर्देवी घटनेवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. यावेळी महिलांच्या
सुरक्षेसाठी कायद्यातील दुरुस्तीवर संघाने यावेळी जोर दिला.
गेल्यावर्षी संघाने राज्य आणि जिल्ह्यात 472 महिला संमेलनाचं आयोजन
करण्यात आलं होतं. त्यात स्त्रीयांचे मुद्दे, पाश्चात्य स्त्रीवाद आणि भारतीय
चिंतन यावर चर्चा करण्यात आली. बंगाल, वायनाड आणि तामिळनाडूतील
घटनांवर या बैठकीत गंभीरपणे चर्चा करण्यता आली. संघाने अहिल्याबाई
होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर सामाजिक परिवर्तनासाठी
काम करण्याची योजना आखण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/howl-of-rain-in-nanded-gavanna-purcha-vedha/