पावसाचा हाहा:कार, घरात पाणी शिरलं, जनावरं वाहून गेली
दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्याचा काही भाग
कालपासून पाण्याखाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पाण्यामुळे अनेक
Related News
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
गावं पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि
नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. नांदेड जिल्ह्यातील
हदगावमधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे.
गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शेतकऱ्यांची अनेक जनावरं
सुद्धा वाहून गेली आहेत. सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.
30 शेतकरी शेतामध्ये, घरावर अडकून पडले आहेत. एसडीआरएफची टीम
बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे.
नांदेडमध्ये पाण्याचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. नांदेड शहरातील मुख्य
स्मशान भूमी पाण्याखाली गेली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नांदेड जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील
आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड शहराशी वसमत आणि इतर
50 ते 60 गावांचा संपर्क तुटला आहे. तर आताही नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा
जोर कायम आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/namibia-severe-drought/