पावसाचा हाहा:कार, घरात पाणी शिरलं, जनावरं वाहून गेली
दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्याचा काही भाग
कालपासून पाण्याखाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पाण्यामुळे अनेक
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
गावं पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि
नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. नांदेड जिल्ह्यातील
हदगावमधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे.
गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शेतकऱ्यांची अनेक जनावरं
सुद्धा वाहून गेली आहेत. सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.
30 शेतकरी शेतामध्ये, घरावर अडकून पडले आहेत. एसडीआरएफची टीम
बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे.
नांदेडमध्ये पाण्याचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. नांदेड शहरातील मुख्य
स्मशान भूमी पाण्याखाली गेली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नांदेड जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील
आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड शहराशी वसमत आणि इतर
50 ते 60 गावांचा संपर्क तुटला आहे. तर आताही नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा
जोर कायम आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/namibia-severe-drought/