काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या
पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा
निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे. अशातच राज्याच्या राजकारणात
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
अजून एका नव्या प्रयोगाची नांदी पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर राज्यात तिसऱ्या आघाडीसाठी
प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजी छत्रपतींनी
पुढाकार घेतला आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली.
स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू,
भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर व इतर छोट्या
पक्षांची मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, मविआ असो किंवा महायुती असो जे राजकारण सुरु आहे ते
महाराष्ट्राला आवडणारं नाही. बच्चू कडू परखड व्यक्तीमत्व आहेत.
आम्ही एकत्र यायला लागलोय चर्चा सुरु आहे. मनोज जरांगेशी पण भेट
घेतली सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्राला एक चांगला पर्याय महाराष्ट्राला
देण्यासाठी चर्चा सुरु आहेत. मी कोणाच्या सोबत नव्हतो. सगळ्यांसाठी आमची
दार उघडी आहेत. कॉमन मिनिमम अजेंडा घेऊन आमच्या हालचाली
सुरु झाल्या आहेत. आमचं अस्तित्व आगामी विधानसभा निवडणुकीत असेल, असेही ते म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/yupis-new-social-media-policy-janamthep-if-anti-national-posts-are-made/