राज्याचे वातावरण सध्या बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन
तापले आहे. केवळ चार वर्षांच्या चिमुकलीवर शिपाई
अक्षय शिंदे याने केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्य
Related News
IMD चा मोठा इशारा! मान्सूनचा तडाखा वाढणार; मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने अनेक राज्यांना अलर्ट
IMD चा मोठा इशारा! पुढील 96 तास मुसळधार प...
Continue reading
Ladki Bahin Yojana तील पात्र महिलांना मोठा दिलासा? बच्चू कडूंचा सरकारला 30 जूनपर्यंत अल्टिमेटम
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री Lad...
Continue reading
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची लॉटरी? मोदी मंत्रिमंडळ विस्तारात पंजाबच्या दोन मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची संधी? मोदी सर...
Continue reading
वजनापलीकडील धोका! दीर्घकालीन सूज कशी बिघडवते यकृत, हृदय आणि रक्तातील साखरेचे आरोग्य?
मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यांसारख्या आजारांबाबत चर्चा झाली की बहुतेक वेळा लक्ष शरीराच्...
Continue reading
ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा; चुका टाळा आणि रिफंड लवकर मिळवा
आर्थिक वर्ष 2025-26 साठी आणि मूल्यांकन वर्ष (AY) 2026-27 साठी आयकर रिटर्न (
Continue reading
अन्न पॅकिंगसाठी वर्तमानपत्रांचा वापर थांबवा; FSSAI ची कडक सूचना
FSSAI ची कडक सूचना : रस्त्यावरील खाद्यपदार्थांपासून ते छोट्या हॉटेलांपर्यं...
Continue reading
फक्त कपड्यांपुरतेच नाही! अॅक्सेसरीजमधूनही करा कलर ब्लॉकिंगचा स्टायलिश प्रयोग
कलर ब्लॉकिंगचा नवा ट्रेंड : फॅशनमध्ये रंगांचा खेळ नेह...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: संभाषणातील ही एक सवय नकळत लोकांना तुमच्यापासून दूर करते
मानसशास्त्र सांगते : काही सवयी अशा असतात ज्या नातेसंबंधांमध्ये ...
Continue reading
'Hai Jawani Toh Ishq Hona Hai'ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी; दोन दिवसांत केवळ 23 कोटींची कमाई
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा बहुचर्चित रोमँटिक-कॉमेडी चित्रपट '
Continue reading
"महिला भूक भागवण्यासाठी नव्हे, तर भावनिक आधारासाठी खातात"; Shefali Shah यांचे भावनिक खाण्यावर भाष्य
बॉलिवूड अभिनेत्री Shefali Shah यांनी नुकतेच म...
Continue reading
'Peddi'चा बॉक्स ऑफिसवर धडाका कायम! तिसऱ्या दिवशीही कोट्यवधींची कमाई; 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेशाची तयारी
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतीक्षित चित्रपट '
Continue reading
World Food Safety Day 2026 : अन्नसुरक्षेबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज; जाणून घ्या महत्त्वाच्या समजुती आणि सत्य
अन्न हे मानवी जीवनाचे मूलभूत गरजांपैकी एक असले तरी त्याची सुरक्षित...
Continue reading
हादरुन गेलं आहे. राज्यसह देशभरातून यावर रोष व्यक्त
केला जात आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नाही,
कायद्याचा धाक नाही आणि पोलीसांवर देखील गृहमंत्र्यांचा
वचक नाही अशा टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून
केल्या जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना
घेरले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे.
या प्रकरणावरुन काँग्रेसने मंत्रालयाबाहेर देखील आंदोलन छेडले.
तसेच येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक काँग्रेसकडून
देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्यांनी बदलापूर प्रकरणावरुन राज्य
सरकारला घेरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी
राज्य सरकारवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा
गंभीर आरोप केला आहे. नाना पटोले म्हणाले आहेत की,
बदलापूरमध्ये झालेल्या प्रकारामुळे समाजमन हेलावून गेलं आहे.
खऱ्या अर्थाने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लहान मुली देखील सुरक्षित नाही.
ही घटना महाराष्ट्रालाच काळीमा फासणारी आहे. किंबहुना हे प्रकरण
दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे.
प्रकरणातील शिक्षण संस्था भाजप आणि संघाशी निगडित असल्याने भाजप
आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी घेत आहे.
परिणामी, त्याचा उद्रेक समाजामधून झाल्याचे काल बघायला मिळाले.
सत्ता आणि सत्तेची गर्मी त्यातून त्याची गुरमी या ठिकाणी बघायला मिळाली.
बदलापूर अत्याराच्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची
नेमणूक करण्यात आली, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी
आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे.
त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली, ज्याने लोकसभेची
निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण?
असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-announces-9-candidates-for-state-assembly/