बदलापुरात दोन निरागस चिमुकल्यांवर एका नराधमानं अत्याचार केला.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात बंदची
हाक देण्यात आली होती. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सर्व आंदोलक
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
शाळेबाहेर एकत्र जमले आणि आंदोलनाला सुरुवात झाली.
आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात जाऊन रेलरोको सुरू केला.
मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे
जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असून
यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले खरे, पण आंदोलकांचं रौंद्ररुप
अनुभवायला मिळालं. याच प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे.
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक
भाजपचे असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की,
देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत.
मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या तर त्याचा राजकारणासाठी
वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. मला वाटतं की,
आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी योजना राबवतोच, पण त्याचबरोबर
त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण फक्त काही
राज्यांनाच टार्गेट करून चालणार नाही, तर देशाच्या प्रत्येक भागांत
आपल्या मुलींचं रक्षण केलं पाहिजे आणि आरोपींवर त्वरित फास्ट ट्रॅक
कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे.
तसेच, बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांची असल्याचं
मला समजलं. मात्र, त्यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही.
थोरात कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलंच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/diabetics-should-take-care-during-rainy-season/