‘त्यांचे बॉस त्यांना महाराष्ट्रात निवडणूक घेण्याची परवानगी देत नाहीत’ -आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांची इलेक्शन कमिशनवर टीका 

भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील

विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. हरियाणा आणि महाराष्ट्र सरकारचा

Related News

कार्यकाळ काही दिवसांच्या फरकाने संपणार असल्याने, दोन्ही राज्यांमध्ये

एकत्र निवडणुका होतील अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने सांगितले की,

महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमधील

अतिरिक्त सुरक्षा आवश्यकता, महाराष्ट्रातील पाऊस आणि राज्यातील

सण-उत्सवांमुळे महाराष्ट्रात नंतर निवडणुका होतील.

यावर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘केंद्राच्या ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’

घोषणेचे काय झाले. आयोगाने जम्मू आणि काश्मीरसोबत महाराष्ट्रामध्ये

निवडणूक घेण्यास नकार दिला. याचे कारण, ‘सुरक्षा दलांवर मर्यादा’ असे नमूद केले.

यावरून दहशतवादी हल्ले वाढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

अजून एक कारण दिले ते म्हणजे, महाराष्ट्रातील ‘पाऊस’. याचा अर्थ फक्त

महाराष्ट्रातच मान्सून आहे, इतर राज्यांमध्ये नाही?

मला वाटते निवडणूक आयोगाचे बॉस अजून त्यांना महाराष्ट्रात निवडणुका घेण्याची

परवानगी देत नाहीत. त्यांच्या कंत्राटदारांना आमचे राज्य लुटण्याची मुभा देण्यासाठी

निवडणूक आयोग त्यांना श्वास घेण्यास वेळ देत आहे असे दिसते!’

Read also: https://ajinkyabharat.com/women-in-odisha-state-can-live-their-periods-for-one-day/

Related News