ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्समध्ये भारतीय कुस्तीपटूंचा
वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे भारतात कुस्तीचा एक वेगळाच चाहता वर्ग
तयार झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहा कुस्तीपटूंनी
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
पदकासाठी दावा ठोकला होता. पण यापैकी फक्त अमन सहरावतच पदक
मिळवू शकला. दुसरीकडे, विनेश फोगाट 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरली.
तर इतर चार स्पर्धक पदकाच्या शर्यतीतच पोहोचले नाहीत.
कुस्तीपटूंच्या या कामगिरीमुळे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंह नाराज आहेत.
यासाठी त्यांनी देशातील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कारणीभूत धरलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी स्पोर्टक्रीडाला दिलेल्या
मुलाखतीत कांस्य पदक विजेत्या अमन सहरावतचं कौतुक केलं.
पण यावेळी त्यांनी इतर कुस्तीपटूंच्या कामगिरीवरून निराशा जाहीर केली.
भारतीय कुस्ती महासंघाला कमीत कमी पाच पदकांची अपेक्षा होती.
संजय सिंह यांच्या मते, कुस्तीपटू चांगल्या पद्धतीने योजना आखत होते,
सर्वकाही ठीक चाललं होतं. पण बृजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या विरोधात
आंदोलन उभं राहिलं. त्यामुळे तयारीला कुठेतरी खीळ बसली. त्यामुळे पदकाची संधी हुकली.
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी कोणाचं नाव घेतलं नाही.
पण त्यांचं वक्तव्य विनेश फोगाटकडे इशारा करत असल्याचं दिसत आहे.
विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी इतर कुस्तीपटूंसह जंतरमंतरवर
आंदोलन केलं होतं. संजय सिंह यांच्या दाव्यानुसार यामुळे भारताचं चार पदकांचं नुकसान झालं.
नशीबानेही भारताची साथ दिली नाही, असंही संजय सिंह यांचं म्हणणं आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/a-total-of-22-upsc-officials-in-the-country-are-bogus/