नवी मुंबईतील भूखंडावरून गणेश नाईक आक्रमक, एकनाथ शिंदेंना थेट इशारा; राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
नवी मुंबईतील भूखंडांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत थेट इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी मागितलेले भूखंड मिळत नसतील, तर मंत्रिपदाचा उपयोग काय, असा रोखठोक सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय तणाव हा काही नवीन नाही. दोघेही अनेकदा एकमेकांवर टीका-प्रतिटिका करताना दिसतात. मात्र, यावेळी नवी मुंबईतील भूखंडांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन गणेश नाईक यांनी केलेली आक्रमक वक्तव्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. नाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी – जसे की हॉस्पिटल, गार्डन, सार्वजनिक उपक्रम – यासाठी भूखंडांची मागणी केली होती. मात्र, हे भूखंड मिळत नसतील तर मंत्रिपद काय चाटण्यासाठी आहे का, असा सवाल त्यांनी केला.
नाईक यांनी पुढे बोलताना गंभीर आरोपही केले. नवी मुंबईतील अनेक भूखंड हे दलालांच्या माध्यमातून थेट बिल्डरांच्या घशात घालण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. “मला याची लाज वाटते की, ज्या मंत्रिमंडळात मी मंत्री आहे, त्याच मंत्रिमंडळाच्या नगरविकास खात्यातील काही लोकांकडून अशा प्रकारचं काम होत आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे नगरविकास विभागावरही बोट ठेवले.
Related News
सांगली जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप! शिंदे-आजित पवार गट महाविकास आघाडीशी युतीच्या मार्गावर
आशियात तणाव वाढला : चीन–जपान संघर्ष उकळतोय!
दररोज 2–3 कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका 20% कमी? नवा अभ्यास देतो धक्कादायक सत्य!
‘The 50’ : रिअॅलिटी शो म्हणजे स्वतःला सिद्ध करणं नाही; अनुभव घेणं आहे – रिद्धी डोगरा
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप प्रेमफुल!
12 किल्ल्यांचा अभिमान: छत्रपती शिवाजी महाराजांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान!
SJVN शेअरमध्ये 182% तुफान वाढ: गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
भारत बोधन एआय कॉनक्लेव्ह 2026 : शिक्षणात डिजिटल क्रांतीसाठी पाऊल
या मुद्द्यावर बोलताना नाईक अधिकच आक्रमक झाले. “माझा राग शांत करायचा असेल तर नवी मुंबईतील सर्व भूखंड परत करा,” असा थेट इशाराही त्यांनी दिला. गप्प राहण्यासाठी मी मंत्रिपद स्वीकारलेले नाही, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या हितासाठी आवाज उठवणे हेच आपले कर्तव्य आहे. पक्षाने मंत्रिपद दिले, त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे, मात्र जनतेच्या प्रश्नांवर तडजोड करणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
नवी मुंबई हा वेगाने विकसित होणारा परिसर असून, येथील जमिनींचे मूल्य प्रचंड आहे. त्यामुळे भूखंडांवरून राजकीय रस्सीखेच होणे हे काही नवीन नाही. मात्र, एका विद्यमान मंत्र्याने थेट उपमुख्यमंत्र्यांना इशारा देणे आणि नगरविकास खात्यावर गंभीर आरोप करणे, यामुळे हा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे. येत्या काळात नवी मुंबईतील भूखंडांचा प्रश्न केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता राज्यस्तरीय राजकारणात केंद्रस्थानी येण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, या वक्तव्यांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे हे आपल्या खास शैलीत टीकेला उत्तर देतात, त्यामुळे या वादात पुढे काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे नवी मुंबईकरांच्या सुविधांचा प्रश्न, तर दुसरीकडे सत्ताधारी मंत्रिमंडळातील अंतर्गत मतभेद, यामुळे आगामी काळात नवी मुंबईतील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
