बालेकिल्ल्यात भुजबळांना कॉलर उडवत इशारा
ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच
नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होत आहे.
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
त्या पार्श्वभूमीवर येथील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या स्वागताची
जोरदार तयारी केली होती. शहरातील तपोवन येथून जिल्ह्यातील
मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात झाली.
तपोवन जुना आडगाव नाका -निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत
पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील
यांचे स्वागत झाले. नाशिकमधील रॅलीत जरांगे यांनी अपेक्षेप्रमाणे
छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच,
आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणाही केल्याचं पाहायला मिळालं.
मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये आज
उदयनराजेस्टाईल कॉलर उडवून दाखवली. नाशिकमधील मराठा समाजाने
आज कॉलर टाईट केली आहे, असं म्हणताना उदयनराजेंप्रमाणे जरांगे यांनीही
कॉलरला हात लावून दाखवला. नाशिक हा मराठ्यांचा बालेकिल्ला आहे,
नाशिकवर भुजबळाचं नाव लिहिलंय का, भुजबळ अन् फडणवीस यांना
राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी
पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ
यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच, निडणुकीत भुजबळ यांचा सुपडा साफ होणार,
आगामी विधानसभेला 288 जागांवर उमेदवार उभे करणार असून
पुढचं सरकार आमचंच येणार, असे भाकीतही मनोज जरांगे यांनी केलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/japanese-scientists-give-hint-about-great-earthquake/