अमरावती मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी दिवसागणिक
आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. कारण राणा दाम्पत्याविरोधात
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ
त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ आणि प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू
यांनी देखील नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटले आहे.
त्यामुळे त्यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोंप आणि टीकेची झोड रंगताना
हल्ली बघायला मिळत आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी आता
पलटवार करत आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांची भूमिका
कटप्पा सारखी असून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसुळ यांना मी सन्मान दिला.
पण आनंदराव अडसूळ यांनी एका महिलेबाबत किती पातळी सोडून बोलायचं,
त्यांनी त्याचे सुद्धा भान ठेवलं पाहिजे. मी महायुती मधून बाहेर पडायचं की नाही,
हे सांगणारे अडसूळ कोण? त्या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
काय तो निर्णय घेतील आणि ठरवतील. मी आजही महायुतीमध्ये आहे.
उद्याही महायुतीमध्येच राहील. पण त्यांनीच 15 दिवसाचा अल्टिमेट दिला होता.
मला जर राज्यपाल पद मिळालं नाही तर मी विचार करेल. असे ते म्हणाले होते.
मुळात आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये काम केलं होतं
सिटी को-ऑपरेटिव बँकमध्ये अजून पर्यंत त्यांच्यावर आरोप पत्र दाखल झालं नाही.
त्यांनी त्या ठिकाणी मोठा घोटाळा केलाय.
त्यामुळे आनंदराव अडसूळ असो की बच्चू कडू यांनी कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून
पाठीत खंजीर खुपसला आहे. अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी पलटवार करत निशाणा साधला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mouni-roy-shares-special-photo-with-her-husband/