५ सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २२ सप्टेंबरला मुंबईत धडक देणार
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी
महायुतीमध्ये असतानाही राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढून
Related News
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
आजोबा-पणजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणाचा किती हक्क? वडिलांनी नाकारला तर काय करावे?
आजोबा-पणजोबांच्या संपत्ती : भारतातील कौटुंब...
Continue reading
शेअर बाजार कोसळला: 4 लाख कोटींचे नुकसान, गुंतवणूकदारांमध्ये घाबराट
भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 850 अंकांन...
Continue reading
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला, ‘शार्प शुटर’ पिस्तुलासह अटक
पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक...
Continue reading
धुळे: शिरपूर तालुक्यात आईने दोन मुलांसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना; एकाच वेळी मृत्यू, संशयित पतीला पोलिसांच्या ताब्यात
धुळे जिल्ह्यातील शिरपूर ता...
Continue reading
प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत: मानसिक ताण, चिंता आणि नैराश्याबाबत खुलासा
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव स...
Continue reading
प्रभाकर मोरे म्हणाले: “शिमगा – देव आपल्या घरी येतो आणि तो अनुभव घ्यायला प्रत्येकाने वेळ द्यावा”
कोकणातील होळी किंवा शिमगा हा सण फक्त रंगांच्या आणि उत्सा...
Continue reading
AI Impact Summit 2026 : रिलायन्स जिओ देणार “स्वस्त AI” – भारताला २१व्या शतकातील AI महाशक्ती बनवण्याचे स्वप्न, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
AI ...
Continue reading
MIM चा राज्यसभेत प्रवेश? ओवैसींचा भडकलेल्या आमदारांचा दावा
बिहारमध्ये राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापल...
Continue reading
तरुण व्यावसायिकांमध्ये वाढत आहे डीप व्हेन थ्रॉम्बोसिसचा धोका
आधी वृद्धांपुरता मर्यादित समजल्या जाणाऱ्या डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (DVT)
Continue reading
मेंदूच्या जखमे नंतर हालचाली पुन्हा शिकण्याची प्रक्रिया : डॉक्टरांनी बॉबथ पद्धतीची माहिती दिली
मेंदूची जखम किंवा न्युरोलॉजिकल इज...
Continue reading
घरच्या घरी चाट बनवताना टाळा हे ६ सामान्य चुका, जे चवीत बिघडवू शकतात
चाट ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड्सपैकी एक आहे. प्रत्येक राज्यात चाटची विविध...
Continue reading
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला मोठा इशारा दिला आहे.
आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली आज ९ ऑगस्ट क्रांती दिनी
छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या ‘आक्रोश मोर्चा’ च्या माध्यमातून
राज्यातील शेतकरी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, कामगारांच्या विविध मागण्या
निवेदनाद्वारे सरकारपुढे मांडल्या. ५ सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास
२२ सप्टेंबर ला मुंबईत धडक देणार, असा इशारा यावेळी आमदार कडू यांनी दिला.
शहरातील क्रांती चौक ते दिल्ली गेट येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर
मोर्चा काढून आमदार कडू यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.
आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्याच्या विविध भागातून आलेल्या दिव्यांग,
शेतकरी, कामगार आदींनी भर पावसात निघालेल्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला.
अशा आहेत मागण्याः
सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात,
शेतकरी कर्जमाफी, दोन वर्षातील कर्जाच्या व्याज आणि मुद्दलावर ५० टक्के सवलत मिळावी,
स्वतंत्र कांदा निर्यातबंदी धोरण बनवावे, फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्यावे,
शेतमजुरांसाठी स्वतंत्र योजना सुरू करावी इत्यादी मागण्या केल्या आहेत.
राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग असतानाही दिव्यागांना मिळणाऱ्या मासिक वेतनात वाढ करावी,
त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावे, प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ सुरू करावे,
शहरी व ग्रामीण घरकुल योजनांमधील निधीत समानता आणावी,
बेघरांना घरे द्यावीत, अर्धवेळ शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी,
मुंबईतील राज्यपाल बंगल्याचा लिलाव करून तो पैसा योजनांसाठी वापरात आणावा,
मुंबईतील पारशी व्यापाऱ्यांनी हडपलेली जमीन शासनजमा करावी
आदी १७ प्रकारच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर
मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.
Read also: https://ajinkyabharat.com/marathi-film-based-mourning-art/