राहुल गांधी यांनी आज वायनाड येथील भूस्खलन झालेल्या भागाचा दौरा केला.
बाधित लोकांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी केवळ
एक मिनिट वार्तालाप करून ते निघून गेले. राहुल गांधी यांचे वडील
Related News
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,
विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपच...
Continue reading
अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.
त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांप...
Continue reading
अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमात...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
बोर्डी गावातील आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या
नाल्यांची दीर्घकाळपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्याव...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल...
Continue reading
पुणे |
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी गुणवंत विद्यार...
Continue reading
राजीव गांधींची मे १९९१ मध्ये बॉम्बस्फोटात हत्या झाली होती.
या प्रसंगाची आठवण करून देताना आजही त्याचप्रकारचे दुःख मला झाले आहे,
असे ते म्हणाले. केरळमधील वायनाड येथे भूस्खलन होऊन
आतापर्यंत तीनशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे.
तर शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. केरळचे माजी खासदार राहुल गांधी
आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज वायनाड येथील
दुर्घटनाग्रस्त भागाचा दौरा केला. बाधित लोकांशी संवाद साधत त्यांना
धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना राहुल गांधी
भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी म्हटले, “माझ्या वडिलांचा
ज्यावेळेस मृत्यू झाला होता, त्यावेळी मला जे दुःख झाले, तेच दुःख आज होत आहे.
मी तर वडील गमावले होते. पण वायनाडमध्ये काहींनी संपूर्ण कुटुंब गमावलं आहे.
कुणाचा भाऊ, वडील, आई दगावली आहे. राहुल गांधी हे २०१९ आणि २०२४ साली
वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
२०२४ साली त्यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून
निवडणूक लढविली होती. त्यामुळे वायनाडचा राजीनामा देऊन याठिकाणी
प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने केली होती.
त्यामुळे आजच्या दौऱ्यात राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधीही दिसून आल्या.
“आम्ही वायनाडमधील लोकांच्या पाठीशी आहोत.
मला अभिमान आहे की, आज संपूर्ण देश वायनाडच्या मदतीसाठी पुढे आला आहे”,
असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांना काही राजकीय प्रश्नही विचारण्यात आले.
त्यावर बोलताना ते म्हणाले, आज राजकारणावर बोलण्याची परिस्थिती नाही.
इथल्या लोकांना मदत हवी आहे. मी याक्षणाला राजकारण करू इच्छित नाही.
माझे संपूर्ण लक्ष वायनाडच्या लोकांना मदत मिळवून देण्यावर आहे.
यावेळी प्रियांका गांधींनीही लोकांशी संवाद साधला. काही काळानंतर
वायनाडमध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीला
त्या उभ्या राहणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या,
माझ्या भावाप्रमाणेच माझीही भावना आहे. मी एका मुलाला भेटले ज्याने
आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी सहा तास प्रयत्न केले. पण तो कुटुंबाला वाचवू शकला नाही.
वायनाडच्या लोकांना मदत करण्यासाठी जे शक्य होईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/rakhi-sawant-mns-district-presidents-comment-on-politics/