गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी जलसाठा
अकोला जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असताना सुद्धा
तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील हनुमान सागर प्रकल्प
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सद्यस्थितीत हनुमान सागर वान प्रकल्पात
२७.०४ टक्के जलसाठा असल्याची माहिती वान प्रकल्प शाखा अभियंता
नयन लोणारे यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली.
श्री. वारी हनुमान सागर प्रकल्पात आजचा उपयुक्त साठा २२.१६ दलघमी एवढा असून,
याची टक्केवारी २७.०४ टक्के एवढी आहे.
हिवरखेडपासून जवळच अकोला, अमरावती, बुलडाणा, या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर
वारी हनुमान येथे वान नदीवर “वान प्रकल्प” हे धरण आहे.
येथील जलाशयाला हनुमान सागर असे नाव दिले आहे.
या प्रकल्पातील शुद्ध पाण्याने अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो गावे
आणि अनेक शहरातील लक्षावधी जनतेची तहान वर्षानुवर्षांपासून भागत आहे.
याच प्रकल्पातून ८४ खेडी पाणीपुरवठा योजना आहे.
एवढेच नव्हे तर या पाण्याच्या सिंचनातून हजारो शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
त्यामुळे वान प्रकल्पाला “वरदान प्रकल्प” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
हनुमान सागरमधून निघालेल्या कालव्यां द्वारे परिसरातील हजारो एकर शेती ओलित केल्या जाते.
हनुमान सागरातून निघालेल्या कालव्याद्वारे शेतकरी गहू, चना भुई शेंग व उन्हाळी मूग
इतर बरेच पिके घेतात. परिसरात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे
परिसरातील शेतकरी आनंदीत दिसत आहे. वारी हनुमान सागर अकोला, बुलडाणा
या दोन जिल्ह्यांसाठी वरदान आहे. तरी यावर्षी ऑगस्ट महिन्यातील पावसाने
पुन्हा श्री हनुमान सागर पूर्णतः भरेल व शेतकऱ्यांच्या आशा पूर्ण होतील,
या आशेवर शेतकरी दिसत आहे, अशी माहिती युधिष्ठिर भांगडिया
सहायक अभियंता वानप्रकल्प व्यवस्थापन उपविभाग तेल्हारा व शाखा अभियंता
नयन लोणारे यांनी दिली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/6-thousand-977-cases-decided-in-lok-adalat/