राज्यात एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा सुरू असताना, दुसरीकडे शासनाने समाजातील अत्यंत दुर्बल घटक असलेल्या अनाथ, निराधार, बेघर व अपंग बालकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून ‘बाल संगोपन योजनेचा’ निधी थकीत असल्याने हजारो बालकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
शासनाकडून अनाथ, एकपालक, बेघर व अपंग मुलांसाठी ‘बाल संगोपन योजना’ राबवली जाते. या योजनेअंतर्गत दरमहा केवळ २२५० रुपये इतके मानधन दिले जाते. महागाईच्या काळात ही रक्कम आधीच अपुरी असताना, तीदेखील वेळेवर न मिळाल्याने या मुलांच्या शिक्षण, औषधोपचार व दैनंदिन गरजांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मे २०२५ पासून ते जानेवारी २०२६ पर्यंतचा निधी अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध केला जातो. मात्र, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आणि थेट बालकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या योजनेचा निधी रोखला जाणे ही शासनाची असंवेदनशीलता दर्शवणारी बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. “लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वेळेवर जमा होतात, मग अनाथ बालकांच्या बाबतीतच ही दिरंगाई का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Related News
चोहोट्टा बाजारात विनापरवाना वीट भट्ट्यांवर कडक कारवाई
आखाती तणावात अडकलेल्या भारतीयांना परत आणा – आमदार हरिष पिंपळे यांची मागणी
अशोक हांडे यांना पार्किंग वादातून मारहाण, कार्यालयात बॅट उगारल्याची घटना
आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचे कामगारांच्या हितासाठी मंत्र्यांना साकडे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार
शरद पवार यांची तब्येत पुन्हा बिघडली – पुण्यात रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल
Ladki Bahin Yojana Update 2026: फॉर्ममधील एक प्रश्न आणि लाखो महिला अपात्र! लाभार्थी 86 लाखांनी कमी
आमणी (खुर्द) गावात अवैध दारूचा महापूर ; विषारी दारूमुळे तरुणाचा मृत्यू, ३०० ग्रामस्थांचे पोलीस ठाण्यावर ठिय्या आंदोलन
AI Video पोस्ट करताय? मोदी सरकारच्या कडक नियमांमुळे आता सोशल मीडिया युजर्सची मोठी जबाबदारी! 2026 मध्ये थेट कारवाई
निलंबित ग्रामसेवकाच्या बनावट सह्यांमुळे लाखो रुपयांचा अपहार!
लोणावळा अपघात : 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, प्रवासात घडलं भयंकर हादरवणारं दुखापत
बकऱ्या शेतात गेल्याने महिलेला लाठीकाठीने मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
या विलंबामुळे अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “आमच्याकडे व्होट बँक नाही म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का?” अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. जर येत्या काही दिवसांत थकीत निधी तात्काळ वितरित करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सरकारला आता तरी जाग येणार का? ‘लाडक्या बहिणींचे’ लाड पुरवताना या अनाथ लेकरांच्या रिकाम्या ताटाकडे शासन लक्ष देणार का, हाच आजचा खरा आणि ज्वलंत प्रश्न आहे.
