राज्यात एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा सुरू असताना, दुसरीकडे शासनाने समाजातील अत्यंत दुर्बल घटक असलेल्या अनाथ, निराधार, बेघर व अपंग बालकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून ‘बाल संगोपन योजनेचा’ निधी थकीत असल्याने हजारो बालकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
शासनाकडून अनाथ, एकपालक, बेघर व अपंग मुलांसाठी ‘बाल संगोपन योजना’ राबवली जाते. या योजनेअंतर्गत दरमहा केवळ २२५० रुपये इतके मानधन दिले जाते. महागाईच्या काळात ही रक्कम आधीच अपुरी असताना, तीदेखील वेळेवर न मिळाल्याने या मुलांच्या शिक्षण, औषधोपचार व दैनंदिन गरजांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मे २०२५ पासून ते जानेवारी २०२६ पर्यंतचा निधी अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध केला जातो. मात्र, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आणि थेट बालकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या योजनेचा निधी रोखला जाणे ही शासनाची असंवेदनशीलता दर्शवणारी बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. “लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वेळेवर जमा होतात, मग अनाथ बालकांच्या बाबतीतच ही दिरंगाई का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Related News
Trump Dividend : Trump यांचा ‘लाडकी बहीण’ स्टाईल मास्टरस्ट्रोक! अमेरिकन नागरिकांना मिळणार 5 हजार डॉलर?
लाडक्या बहिणींचं मानधन 1500 वरून 3 हजार करा; आमदार रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लाडकी बहीण योजनेचा मोठा खुलासा! 92 लाख अपात्र लाभार्थी, 9,605 कोटी रुपये खात्यात; RTI मधून धक्कादायक माहिती
लाडक्या बहिणींचे पैसे कधीपर्यंत मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेत मोठी छाटणी! 92 लाख महिलांची नावे यादीतून गायब; आता इतक्यांनाच मिळणार पैसे
महायुतीत पुन्हा धुसफूस? ‘लाडकी बहीण’ योजनेवरून शिंदेसेनेचा भाजपला थेट टोला
Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींचे पैसे बंद; जळगावातील 2 हजार महिलांचा मोठा निर्णय
लाडकी बहिण योजनेबाबत मोठी बातमी! ई-केवायसीसाठी मिळणार 6 महिन्यांची मुदत
लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर! खात्यात जमा होऊ लागले 1500 रुपये; 3000 रुपयांबाबत मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेत 92 लाख महिलांची नावे वगळली? सरकारचा मोठा खुलासा
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर मोठा दावा; ‘सर्व माहिती शरद पवारांना होती’
या विलंबामुळे अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “आमच्याकडे व्होट बँक नाही म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का?” अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. जर येत्या काही दिवसांत थकीत निधी तात्काळ वितरित करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सरकारला आता तरी जाग येणार का? ‘लाडक्या बहिणींचे’ लाड पुरवताना या अनाथ लेकरांच्या रिकाम्या ताटाकडे शासन लक्ष देणार का, हाच आजचा खरा आणि ज्वलंत प्रश्न आहे.
