लोकमान्य टिळक यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने
मानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या
ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ)
वतीने शनिवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी
शनिवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.
गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या
104 व्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
महाराष्ट्र सदनात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या सोहळ्यात
सुधा मूर्ती यांना टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक
यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,
खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तसेच डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक
यांच्यासह ट्रस्टचे अन्य विश्वस्त यावेळी उपस्थित असतील.
स्मृतिचिन्ह आणि एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात.
कर्नाटक सरकारच्या सर्व शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत.
त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे.
कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगळुरू शहर व परिसरात त्यांनी
सुमारे 10,000 स्वच्छतागृहे संस्थेच्या माध्यमातून उभारली.
तामिळनाडू आणि अंदमान येथे त्सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले.
महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील रहिवाशांनाही संस्थेने मदत दिलेली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/pm-modi-to-visit-ukraine-next-month/