अकोला :
मराठा पाटील समाजातील अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नांवर मोकळा संवाद घडवून आणण्यासाठी, परंपरेच्या नावाखाली रुजलेल्या अनिष्ट रूढींना छेद देण्यासाठी आणि भावी पिढीसाठी विवेकी समाजघडणीचा ध्यास घेऊन मराठा पाटील संघ, बाळापुर तालुक्याच्या वतीने आज (दि. १७) ‘समाजसंवाद पदयात्रे’चा शुभारंभ होत आहे. दुपारी ३ वाजता काजीखेड येथून मान्यवरांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
संस्थापक अध्यक्ष प्रा. राजदत्त मानकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली व संघटनेचे अध्यक्ष शरद वानखडे यांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही पदयात्रा २६ जानेवारीपर्यंत काजीखेड ते वाडेगाव या मार्गावरून प्रवास करणार आहे. “सहभागी व्हा! सहभागी व्हा!” अशी समाजाला साद घालणारी ही पदयात्रा केवळ चालण्याची नव्हे, तर विचारांची व परिवर्तनाची ठरणार आहे.
पदयात्रेदरम्यान समाजातील लग्नसमारंभातील वाढता खर्च, वर–वधू संशोधनातील विलंब, कृषी शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर प्रत्येक गावात सभा घेऊन मुक्त विचारमंथन होणार आहे. समाजाने स्वतःशी संवाद साधत प्रश्न ओळखावेत व उत्तरांची सामूहिक वाटचाल करावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Related News
5 मोठे कायदेशीर मुद्दे : अंतरिम स्थगिती म्हणजे अंतिम विजय नाही; बाळापूर नगर परिषद प्रकरणाचा संपूर्ण खुलासा
अवैध जात प्रमाणपत्रामुळे अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र; राजकारणात मोठी खळबळ
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूरात पोलिसांचा शस्त्र सराव व रूट मार्च
MPSC Exam 2026 : 5 मोठी कारणे; CBT निर्णयाला तीव्र विरोध, OMR पद्धत कायम ठेवण्याची जोरदार मागणी
धक्कादायक! उमरा गावात चवताळलेल्या माकडाचा हैदोस; 10 दिवसांत 3 जण जखमी
वादानंतर दमदार पुनरागमन! ‘खालिद के शिवाजी’ OTT वर रिलीज; जाणून घ्या 7 महत्त्वाच्या गोष्टी आणि कथानक
मोठा धक्कादायक खुलासा! बनावट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
MHT-CET 2026 मध्ये एकाच विद्यार्थिनीला 2 वेगवेगळे पर्सेंटाईल; मुख्यमंत्रींकडे तातडीच्या चौकशीची शक्तिशाली मागणी
मोठा दिलासा! सैनिक हत्या प्रकरणात आरोपीचा जामीन रद्द; न्यायालयाचे 3 महत्त्वाचे आदेश | Akola Crime News
अकोल्यातील धक्कादायक खूनप्रकरण: अवघ्या 3 तासांत एलसीबीचा मोठा खुलासा, अकस्मात मृत्यूचा बनाव फसला
पैशाच्या वादातून मित्राचा खून; 3 तासांत पोलिसांनी उघड केला मोठा बनाव धक्कादायक सत्याने हादरले अकोला
अकोल्यात 5 लाखांची फसवणूक ! 3 किलो सोन्याच्या नाण्यांच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाची अकोल्यात फसवणूक;
या प्रवासात काजीखेड, जानोरी मोखा, वझेगाव, हिंगणा दगडखेड, नागद, सागद, बहादुरा, कारंजा, सोनाळा, बोरगाव वैराळे, शिंगोली, मोरझाडी, उरळ बु., मोरगाव, हसनापूर, अडोशी, सोनगिरी, वाडेगाव, मानकी, सांगवी, बाळापूर आदी गावांत मुक्काम व ग्रामसभा होणार आहेत. दररोज सकाळी ८.३० वाजता पदयात्रेला सुरुवात होऊन सायंकाळी ५ वाजता मुक्कामाच्या गावी पोहोचणार आहे.
हार, शाल, पुष्पगुच्छांसारख्या दिखाऊ सत्कारांना फाटा देऊन विचार, सहभाग व संवादाला प्राधान्य देण्याचे आवाहन अध्यक्ष शरद वानखडे यांनी केले आहे. वारकरी दिंडी ग्रामप्रदक्षिणेसाठी रथासमोर ठेवणे, गुणवंत विद्यार्थ्यांची यादी सादर करणे, महिला, युवक, युवती व बालकांचा सक्रिय सहभाग घडवून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पदयात्रेदरम्यान समाजाची दिनदर्शिका विक्री, पुढील गावापर्यंत सहभागाची संधी, तसेच उपवर मुला–मुलींच्या ऑनलाईन बायोडाटाचे संकलन करून समाजोपयोगी उपक्रमांना चालना दिली जाणार आहे. ही पदयात्रा समाजाच्या आत्मपरीक्षणाचा व परिवर्तनाचा प्रवास ठरेल, असा विश्वास समाजातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केला आहे.
मराठा पाटील समाजातील प्रत्येक घटकाने या समाजसंवाद पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा योद्धा गजानन हरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
