विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या
३ उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला.
या निवडणुकीत मविआची काही मते फुटली असा अंदाज आहे.
Related News
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
त्यात देवेंद्र फडणवीसांनी मविआचे २० आमदार महायुतीकडे आल्याने
त्यांचा फुगा फुटला असं विधान केले.
त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधत
देवेंद्र फडणवीसांच्या अटकेची मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, तुमचा भ्रष्टाचार, तुमचा पक्ष आणि हे सरकार भ्रष्टाचारातून आलेले आहे.
पैसा फेको, तमाशा देखो असं आहे.
देवेंद्र फडणवीस बोलतात महाविकास आघाडीचे २० आमदार फोडले,
हे चिंचोके देऊन फोडले का?,
केंद्रीय गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नकोय ना, मग देवेंद्र फडणवीसांना अटक करा.
२० आमदार फोडले, फडणवीसांनी किती पैसे दिले,
ईडी, सीबीआय चौकशी फडणवीसांच्या मागे लावा.
तुम्ही सच्चे असाल ना, पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसांची करा
असं राऊतांनी अमित शाहांना आव्हान केले.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत महायुतीने ९ उमेदवार दिले होते
तर मविआकडून ३ उमेदवार रिंगणात होते.
मविआत काँग्रेसकडून १, ठाकरे गटाकडून १ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं
शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता.
तर महायुतीने पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरख,
सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली.
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाने प्रत्येकी २ उमेदवार उभे केले.
लोकसभेचा निकाल पाहता महायुतीची मते फुटतील
असा दावा मविआकडून वर्तवला जात होता.
परंतु या निवडणुकीत मविआचेच काही आमदार फुटल्याचे समोर आले.
त्यावरून आता फडणवीस-राऊतांमध्ये शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला.
Read also: https://ajinkyabharat.com/take-care-of-dengue-heat-health/