विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या
३ उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला.
या निवडणुकीत मविआची काही मते फुटली असा अंदाज आहे.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
त्यात देवेंद्र फडणवीसांनी मविआचे २० आमदार महायुतीकडे आल्याने
त्यांचा फुगा फुटला असं विधान केले.
त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधत
देवेंद्र फडणवीसांच्या अटकेची मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, तुमचा भ्रष्टाचार, तुमचा पक्ष आणि हे सरकार भ्रष्टाचारातून आलेले आहे.
पैसा फेको, तमाशा देखो असं आहे.
देवेंद्र फडणवीस बोलतात महाविकास आघाडीचे २० आमदार फोडले,
हे चिंचोके देऊन फोडले का?,
केंद्रीय गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नकोय ना, मग देवेंद्र फडणवीसांना अटक करा.
२० आमदार फोडले, फडणवीसांनी किती पैसे दिले,
ईडी, सीबीआय चौकशी फडणवीसांच्या मागे लावा.
तुम्ही सच्चे असाल ना, पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसांची करा
असं राऊतांनी अमित शाहांना आव्हान केले.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत महायुतीने ९ उमेदवार दिले होते
तर मविआकडून ३ उमेदवार रिंगणात होते.
मविआत काँग्रेसकडून १, ठाकरे गटाकडून १ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं
शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता.
तर महायुतीने पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरख,
सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली.
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाने प्रत्येकी २ उमेदवार उभे केले.
लोकसभेचा निकाल पाहता महायुतीची मते फुटतील
असा दावा मविआकडून वर्तवला जात होता.
परंतु या निवडणुकीत मविआचेच काही आमदार फुटल्याचे समोर आले.
त्यावरून आता फडणवीस-राऊतांमध्ये शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला.
Read also: https://ajinkyabharat.com/take-care-of-dengue-heat-health/