बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या
ग्राम जनूना (पुनर्वसन) येथील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत,
Related News
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
मनसे तालुका अध्यक्ष सचिन पाटील गालट
व मनविसे चे तालुका अध्यक्ष वैभव पाटील कोहर यांच्या नेतृत्वात
अनेक ग्रामस्थांनी स्वतःला मातीत गाडून घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे,
तर रोशन जाधव, दीपक खराटे, सरपंच नितीन वाकोडे, सचिन पाटील चांभारे,
विकी लहरिया, अमर उमक, ग्राम पंचायत सदस्य ईश्वर वाळेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आंदोलन करत आहेत.
रस्त्यासंबंधी संबंधीत अधिकारी जोपर्यंत लेखी स्वरूपात
कामाबद्दल माहिती देऊन काम सुरु होत नाही
तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
जनुना गावातून जाणारा मुख्य रस्ता
अर्थात महान पातूर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याची पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्ता प्रलंबित असून
येथील नागरिकांना ये जा करण्याकरीता नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
रस्त्याची चाळणी झाल्यामुळे रस्ता अपघातांना निमंत्रण देत असतो,
अश्या परिस्थितीत जीवित हानी होण्याचे नकारता येत नाही.
काही महिन्यांअगोदर मुर्तिजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार
यांनी सदर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून गावात फलक लावले
मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरले आहेत.
गावातली नागरिकांसह परिसरातील शेकडो नागरिकांनी आता हा रस्ता रोखून धरला आहे.
यांच्या मागणीची दखल घेत प्रशासन यावर तोडगा काढेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/this-is-the-time-for-you-and-me-to-come-together/