विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी होत असलेल्या
निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह महायुती व महविकास आघाडीचे
एकूण १४ उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
महायुतीकडून भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार परिणय फुके,
सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर
यांना उमेदवारी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी खासदार भावना गवळी
व माजी खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे तसेच राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाने प्रज्ञा राजीव सातव यांना
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना समर्थन दिले आहे
तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक
शिवसेना सचिव क्रिकेट बोर्डाचे सदस्य मिलिंद नार्वेकर
यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे
महायुती आणि महाविकास आघाडीचे विधानसभेतील एकूण संख्याबळ लक्षात घेता
महायुतीला धोका नाही मात्र.
नार्वेकर व जयंत पाटील यांच्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व उमेदवारांसह अरुण जगताप आणि अजय सेंगर
या अपक्ष उमेदवारांनीही आज आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
प्रत्येक उमेदवारासाठी १० आमदारांची प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी आवश्यक असते.
उद्या बुधवारी या सर्व अर्जाची छाननी होणार असून या छाननीत दोन अपक्षांचे अर्ज बाद होतील
नार्वेकर यांनी माघार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल,
मात्र उमेदवारी कायम ठेवल्यास ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात राहतील
आणि त्यामुळे निवडणूक अटळ राहील मात्र संख्येची जुळवाजुळव करण्यासाठी
शिवसेनेला व जयंत पाटील याना या निवडणुकीत कसरत करावी लागणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/there-is-a-fight-between-biden-and-trump-in-the-us-presidential-election/