पुण्यात लग्नानंतर काही दिवसांतच एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मध्यवर्ती भागातील समर्थ पोलीस ठाण्यात २३ वर्षीय तरुणीने पतीसह सासरच्या एकूण सहा जणांविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे. मुलगा नपुंसक असल्याची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवत लग्न लावल्याचा तसेच नंतर धमक्या, मानसिक छळ आणि बदनामी केल्याचा तिने आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.
काय आहे तक्रारदार तरुणीचा आरोप?
तक्रारीनुसार, पीडितेचा विवाह १८ एप्रिल २०२५ रोजी झाला. काही आठवड्यांतच तिला पतीमध्ये पुरुषत्व नसल्याची कल्पना आली. यानंतर तिने शांततेने हा मुद्दा पती व सासरच्या मंडळींसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अपेक्षेप्रमाणे परिस्थिती हाताळण्याऐवजी तिच्यावरच उलट दबाव टाकण्यात आला, असे पीडितेने पोलिसांकडे नमूद केले.
तिने सांगितले की, “ही बाब घराबाहेर सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी तिला थेट धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर तिचेच एखाद्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा खोटा आरोप करून तिची बदनामी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. लग्नात पुरेसा मानपान केला नाही, अशा किरकोळ कारणांवरूनही तिला सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
Related News
महाराष्ट्राची ‘वाघीण’ कुस्तीपटू अश्विनी पौळ प्रकरणात नळदुर्ग किल्ल्यातील रजिस्टर नोंदीने खळबळ; ‘पती पाठीमागून येत आहेत’ सांगून किल्ल्यात प्रवेश
महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात आपल...
Continue reading
महाराष्ट्र पुन्हा हादरला! खासगी शाळेच्या बस चालकाकडून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
नवी मुंबईतील धक्कादायक घटना; आरोपी बस चालकाला अटक, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
नवी मुंबई आणि पन...
Continue reading
अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड ...
Continue reading
समृद्धी महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ; टायर फोडून लुटमार, दगडफेक अन् हवेत गोळीबार, तब्बल १८ लाखांचा ऐवज लंपास
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ...
Continue reading
Nepal मध्ये माणुसकीला काळिमा! महापुरातील मृतदेहांवरील दागिन्यांची लूट; व्हिडीओ व्हायरल होताच दोघांना अटक
Nepal : नैसर्गिक आपत्तीच्या काळात माणुसकी, संव...
Continue reading
अंकित बलियान हत्या: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकल्यानंतर दोन तासांत हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यु...
Continue reading
MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; थेट अपर सचिवांना अटक, ‘लव्ह अँगल’मुळे तपासाला नवे वळण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या...
Continue reading
Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंग...
Continue reading
पाय बांधले, डोक्यावर वार; NEET विद्यार्थिनीच्या हत्येने वाराणसी हादरलं, पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये NEET परी...
Continue reading
Mumbai : मुंबईत हुंडा छळाच्या तक्रारींमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ; मात्र हुंडाबळी आणि आत्महत्यांमध्ये मोठी घट
Mumbai : मुंबईत विवाहित महिलांच्या हुंड्यासा...
Continue reading
मुलाला केबिनबाहेर हुसकावले; पण तो पुन्हा आत आला अन् डॉक्टरवर केला हल्ला, कल्याणमध्ये नेमकं घडलं काय?
Kalyan Crime News : कल्याण पूर्वेतील भानु ज्योत हॉ...
Continue reading
Khavdya Dongar Case : संभाजीनगरातील खवड्या डोंगराचं रहस्य काय? ‘खवड्या’ असं नाव का पडलं? वाचून धक्काच बसेल!
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभा...
Continue reading
जाणीवपूर्वक लपवली महत्त्वाची माहिती?
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत स्पष्टपणे म्हटले आहे की, पती नपुंसक असल्याची संपूर्ण माहिती कुटुंबीयांना होती, तरीही त्यांनी ती गोष्ट इंतेनशपूर्वक लपवून ठेवली. फसवणूक करून लग्न लावण्यात आल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. या प्रकरणात पती, सासू, सासरे, नणंद, नणंदेचा पती आणि चुलत सासरा या सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांचा तपास सुरू
समर्थ पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधितांविरुद्ध फसवणूक, धमकी आणि मानसिक छळाचे गुन्हे नोंदवले आहेत. प्रकरणातील आरोप गंभीर असल्याने पुढील तपास गतीने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अशाच प्रकारची घटना येरवड्यातही
दरम्यान, मागील आठवड्यात येरवडा परिसरातही एक धक्कादायक घटना समोर आली होती. लग्नानंतर पती जवळीक साधत नसल्याची तक्रार पत्नीने केली. यावरून पती आणि सासरकडील मंडळींनी तिला सिगरेटचे चटके दिल्याचा प्रकार उघड झाला होता. त्या प्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
लग्नानंतर महिलांवरील छळाच्या घटना वाढत्या?
पुण्यात गेल्या काही महिन्यांत लग्नानंतर महिलांना छळ, धमक्या, मानसिक त्रास किंवा फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येते. पती किंवा सासरकडील मंडळींकडून महत्त्वाची माहिती लपवून लग्न करणे, त्यानंतर अत्याचार किंवा धमक्या देणे असे प्रकार चिंताजनक पातळीवर वाढत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
या घटनांमुळे विवाहापूर्वीच्या पडताळणीची, पारदर्शक संवादाची आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांची गरज अधोरेखित होत आहे. पुण्यातील दोन्ही ताज्या घटनांनी पुन्हा एकदा महिलांवरील छळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.