अकोल्यात आठ वर्षांपासून विकास फाउंडेशनकडून उपक्रम
विधवा, परितक्ता, घटस्फोटिता महिलेने काय घालावे, कुंकू लावावे की लावू नये,
तिने कसे जगले पाहिजे, तिने दुसरे लग्न करावे की करू नये?
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
आजही असंख्य प्रश्न, शंका, निबंध समाजाकडून एकल महिलांवर घातले जातात.
अशात सौभाग्यवती महिलांप्रमाणेच एकल महिलांनाही वटपौर्णिमेचा उत्सव साजरा करता यावा,
यासाठी अकोल्यातील श्री विकास फाउंडेशनच्या वतीने
सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.
मागील ८ वर्षांपासून एकल महिलांना उभारी देणारी परंपरा
अखंडपणे सुरू असून संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
गोरक्षण रोड दत्त मंदिर, दत्त कॉलनीतील एकल महिला एकत्र आल्या.
कुणाच्या पतीचे अपघातात निधन झाले, तर काहींचा घटस्फोट झाला.
काही महिलांच्या पतीने त्यांना सोडून दिले.
अशा महिलांचा हळदीकुंकू, महिलांच्या विशेष उत्सव प्रसंगी त्यांचा फारसा विचार होत नाही.
महिलांचे उत्सव म्हणजे, त्यानिमित्त एकत्र होऊन गुजगोष्टी करणे, एकमेकांचे सुख, दुःख वाटून घेण्याचे प्रयोजन.
भाव-भावनांचे आदान-प्रदान करण्याची एक व्यवस्थाच.
पण दुर्दैवाने आयुष्यात अचानक आलेल्या के संकटामुळे एकल महिला यातून वेगळ्या पडतात.
खरंतर त्यांना त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचे व्यासपीठ हवे असते.
पुन्हा आयुष्य नव्याने जगण्यासाठी सर्वांनी त्यांना सांभाळून घेणे अपेक्षित असते.
हिच गोष्ट लक्षात घेऊन श्री विकास फाउंडेशनच्या विधवा, परितक्ता,
घटस्फोटिता महिलांसाठी वटपौर्णिमा उपक्रम सुरू केला.
सुरुवातीला समाजाकडून त्यांना विरोध झाला.
पण हळूहळू हा बदल परिसरात स्वीकारण्यात आला.
समजून घेणे आवश्यक
माझे पतीच्या निधनानंतर मी वटपौर्णिमा उत्सव साजरा केला.
माझ्याप्रमाणे इतर महिलांना तसे करता, यावे हाच उपक्रमाचा उद्देश होता.
एकल महिलांच्या समस्यांना समाजाने समजून घेण्याची गरज आहे.
त्यांना वेगळे न करता त्यांना सामावून घेणे आवश्यक आहे.
– वैष्णवी दातकर, अध्यक्ष, श्री विकास फाउंडेशन
Read also: https://ajinkyabharat.com/dont-ignore-mood-swings/