अकोल्यात आठ वर्षांपासून विकास फाउंडेशनकडून उपक्रम
विधवा, परितक्ता, घटस्फोटिता महिलेने काय घालावे, कुंकू लावावे की लावू नये,
तिने कसे जगले पाहिजे, तिने दुसरे लग्न करावे की करू नये?
Related News
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
आजही असंख्य प्रश्न, शंका, निबंध समाजाकडून एकल महिलांवर घातले जातात.
अशात सौभाग्यवती महिलांप्रमाणेच एकल महिलांनाही वटपौर्णिमेचा उत्सव साजरा करता यावा,
यासाठी अकोल्यातील श्री विकास फाउंडेशनच्या वतीने
सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.
मागील ८ वर्षांपासून एकल महिलांना उभारी देणारी परंपरा
अखंडपणे सुरू असून संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
गोरक्षण रोड दत्त मंदिर, दत्त कॉलनीतील एकल महिला एकत्र आल्या.
कुणाच्या पतीचे अपघातात निधन झाले, तर काहींचा घटस्फोट झाला.
काही महिलांच्या पतीने त्यांना सोडून दिले.
अशा महिलांचा हळदीकुंकू, महिलांच्या विशेष उत्सव प्रसंगी त्यांचा फारसा विचार होत नाही.
महिलांचे उत्सव म्हणजे, त्यानिमित्त एकत्र होऊन गुजगोष्टी करणे, एकमेकांचे सुख, दुःख वाटून घेण्याचे प्रयोजन.
भाव-भावनांचे आदान-प्रदान करण्याची एक व्यवस्थाच.
पण दुर्दैवाने आयुष्यात अचानक आलेल्या के संकटामुळे एकल महिला यातून वेगळ्या पडतात.
खरंतर त्यांना त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचे व्यासपीठ हवे असते.
पुन्हा आयुष्य नव्याने जगण्यासाठी सर्वांनी त्यांना सांभाळून घेणे अपेक्षित असते.
हिच गोष्ट लक्षात घेऊन श्री विकास फाउंडेशनच्या विधवा, परितक्ता,
घटस्फोटिता महिलांसाठी वटपौर्णिमा उपक्रम सुरू केला.
सुरुवातीला समाजाकडून त्यांना विरोध झाला.
पण हळूहळू हा बदल परिसरात स्वीकारण्यात आला.
समजून घेणे आवश्यक
माझे पतीच्या निधनानंतर मी वटपौर्णिमा उत्सव साजरा केला.
माझ्याप्रमाणे इतर महिलांना तसे करता, यावे हाच उपक्रमाचा उद्देश होता.
एकल महिलांच्या समस्यांना समाजाने समजून घेण्याची गरज आहे.
त्यांना वेगळे न करता त्यांना सामावून घेणे आवश्यक आहे.
– वैष्णवी दातकर, अध्यक्ष, श्री विकास फाउंडेशन
Read also: https://ajinkyabharat.com/dont-ignore-mood-swings/