खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर
भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
मंगळवारी (दि.18) निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त
कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले.
यावरुन आता एका भारतीय वंशाच्या खासदाराने
कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली.
खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला
खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडियन विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली.
चंद्रा आर्य म्हणाले की, खलिस्तानी दहशतवादी भारताचेच नव्हे,
तर कॅनडाचेही नुकसान करत आहेत. यावेळी त्यांनी 1985 मध्ये
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये झालेल्या स्फोटाची आठवण करून दिली.
तसेच, त्यांनी 23 जून रोजी 1985 च्या बॉम्बस्फोटातील बळींच्या स्मरणार्थ
एका कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे माहिती दिली
आणि सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले.
23 जून 2024 रोजी राजधानी ओटावा येथील
डाऊ लेकजवळील स्मारकाच्या ठिकाणी आणि
ओंटारियोमधील क्वीन्स पार्कमध्ये दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
चंद्रा संसदेत बोलताना म्हणाले की,
खलिस्तानी समर्थक देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत.
23 जून हा दहशतवादामुळे बळी पडलेल्यांचा स्मृतिदिन आहे.
39 वर्षांपूर्वी याच दिवशी एअर इंडियाचे विमान हवेत असताना उडवण्यात आले होते.
त्या घटनेत 329 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता.
कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला होता,
ज्यात एकूण 268 कॅनेडियनही ठार झाले होते.
नुकतंच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी,
यांच्या हत्येचा कॅनडाच्या संसदेत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावरुन देशात काळ्या शक्ती पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते, अशी टीकाही केली.
Read also: https://ajinkyabharat.com/because-of-the-central-governments-mischief-you-became-a-disgrace/