दरवर्षी पावसाळा प्रारंभ झाल्यानंतर भाजी बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वाढतात.
यावर्षी सुद्धा पावसाळा प्रारंभ होताच भाजी बाजारात भाज्यांचे दर
मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
Related News
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला वेग आला असून २७००४.४० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत....
Continue reading
सैनिक हत्या : अकोल्यातील भारतीय सैन्यातील जवान सुशील तेलगोटे हत्या प्रकरणात आरोपी अंकित उर्फ छोटू खंडारे याचा जामीन न्यायालयाने रद्द केला. धमक्या...
Continue reading
अकोल्यात अकस्मात मृत्यूचा बनाव करून खून लपविण्याचा प्रयत्न एलसीबीने अवघ्या 3 तासांत उधळून लावला. पैशांच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी मुख्य आ...
Continue reading
Akola News : पैशाच्या व्यवहारातून मैत्रीचा दुर्दैवी शेवट; 3 तासांत पोलिसांनी उघड केला खुनाचा धक्कादायक बनाव
मित्राचा खून ( अकोला ): अकोला शहरात पैशाच्या व्यवहारातून सुरू झालेल्या ...
Continue reading
पिंपरी-चिंचवडमध्ये दुमजली इमारत कोसळली; 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावासाठी 3 पथके तैनात
इमारत कोसळली : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपर...
Continue reading
अकोल्यात बोगस बियाण्यांचा कहर; 5 हजारांहून अधिक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट?
बोगस बियाण्यांचा कहर : खरीप हंगामासाठी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी करणाऱ्या अकोला ...
Continue reading
Nashik Rain: पहिल्याच मुसळधार पावसात नाशिककरांची दाणादाण! कुंभमेळ्यासाठी खोदलेल्या रस्त्यांवर वाहने रुतली; NMC च्या नियोजनावर गंभीर प्रश्न
नाशिक : जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल...
Continue reading
पालघर : हसता हसता रडू आलं! अवघ्या 2 मिनिटांत बदललं चित्र; धबधब्यावर अचानक वाढलेल्या पाण्यामुळे पर्यटकांचा थरारक अनुभव
पालघर : पावसाळा सुरू होताच राज्यभरातील धबधबे आणि पर्यटनस्थळा...
Continue reading
4 वर्षे सातत्याने काम करूनही कमी पडलो; उघड्या मॅनहोलच्या जीवघेण्या धोक्यावर आयुक्त अश्विनी भिडेंची मोठी कबुली
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे : गेल्या काही दिवसांपासून सुरू अस...
Continue reading
Monsoon Emergency Kit: मान्सूनपूर्वीची मोठी तयारी! घरात ठेवा या 10 अत्यावश्यक वस्तू, संकटात ठरतील जीवनरक्षक
मान्सून आपत्कालीन किट : पावसाळा हा उष्णतेपासून दिलासा देणारा ऋतू असला ...
Continue reading
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एका घरातून तब्बल 40 कोब्राची पिल्ले आढळल्याने खळबळ उडाली. सर्पमित्र आणि वन...
Continue reading
त्यामुळे नागरिकांना भाज्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागत असून
पावसाळा संपेपर्यंत ही भाज्यांची दरवाढ कायम राहणार असल्याचे दिसून येते.
पावसाळ्याच्या तोंडावर बाजारात भाज्यांची आवक कमी होते.
त्यामुळे दरवर्षी भाज्यांचे दर वाढतात.
यावर्षी अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही मात्र भाज्यांची आवक कमी झाल्याने
भाज्यांचे दर वाढलेले आहेत.
पावसाळ्या व्यतिरिक्त एका कुटुंबाचा आठवड्याचा भाजीपाला ३०० ते ४०० रुपयांमध्ये होतो.
त्यासाठी आता आठवड्याला ५०० ते ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.
पावसाळा संपेपर्यंत ही परिस्थिती राहणार आहे.
पावसाळ्यात पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक परिस्थितीमुळे
भाजीपाला लवकर खराब होतो किंवा सडतो.
आधीच उत्पादन कमी त्यात भाजीपाला खराब होत असल्याने
बाजारातील आवक कमी होते परिणामी भाव वाढतात.
सध्याच्या परिस्थितीत भाजी बाजारामध्ये बटाटे ४० रुपये किलो, वांगी ६० रुपये किलो,
टोमॅटो ८० रुपये किलो, पालक ८० रुपये किलो, घोळ, चवळी, ६० रुपये किलो,
गवार ८० रुपये किलो, चवळीच्या शेंगा ८० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो,
लसन २०९ रुपये किलो, अद्रक १६० रुपये किलो, कोथिंबीर २०० रुपये किलो,
गंगाफळ ४० रुपये किलो, फूलकोबी ८० रुपये किलो, पत्ताकोबी ६० रुपये किलो,
मेथी ८० रुपये किलो, शेपू ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो,
गिलके ८० रुपये किलो, असे पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव आहेत.
भाज्यांना पर्याय नाही आणि रोजच्या दोन वेळेच्या जेवणात भाज्या लागतातच.
त्यामुळे दर वाढले तरी नागरिकांना
दररोज पालेभाज्या व फळभाज्या विकत घ्याव्या लागत आहेत.
जांभूळ बाजारात दाखल
दरवर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी बाजारात जांभूळ या फळाचे आगमन होते.
यावर्षी सुद्धा बाजारात जांभूळ दाखल झाले आहेत.
आंबट, गोड, तुरट अशा मिश्र चवीचे जांभूळ आरोग्यासाठी फायदेकारक मानले जाते.
विशेष करून शुगरच्या रुग्णांसाठी जांभूळ फायदेकारक असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे जांभूळांना बाजारात मोठी मागणी असते.
यावर्षीही जांभूळ बाजारात दाखल होताच मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
रानभाज्यांची प्रतीक्षा
पावसाळा प्रारंभ झाल्यानंतर दरवर्षी बाजारपेठेमध्ये
विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी येतात.
या रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेकारक मानल्या जातात.
पावसाळ्याच्या दोन महिन्यातच रानभाज्या मिळतात.
त्यामुळे बरेच नागरिक ह्या रानभाज्या खरेदी करतात.
अकोल्यात रानभाज्यांचा महोत्सव सुद्धा साजरा केला जातो.
पावसाळा प्रारंभ झाल्याने आता अनेक नागरिक या रानभाज्यांची प्रतीक्षा करीत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/550-haj-pilgrims-die-due-to-heat-temperature-in-mecca-saudi-reaches-52-degrees-celsius/