दरवर्षी पावसाळा प्रारंभ झाल्यानंतर भाजी बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वाढतात.
यावर्षी सुद्धा पावसाळा प्रारंभ होताच भाजी बाजारात भाज्यांचे दर
मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
Related News
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
नाशिक (16 एप्रिल 2025) – नाशिक महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या
काठे गली सिग्नल परिसरातील सातपीर दर्गा हटविण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या महापालिका
आणि पोलिस पथकावर काल रात्री दगडफ...
Continue reading
त्यामुळे नागरिकांना भाज्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागत असून
पावसाळा संपेपर्यंत ही भाज्यांची दरवाढ कायम राहणार असल्याचे दिसून येते.
पावसाळ्याच्या तोंडावर बाजारात भाज्यांची आवक कमी होते.
त्यामुळे दरवर्षी भाज्यांचे दर वाढतात.
यावर्षी अद्याप पाहिजे तसा पाऊस झालेला नाही मात्र भाज्यांची आवक कमी झाल्याने
भाज्यांचे दर वाढलेले आहेत.
पावसाळ्या व्यतिरिक्त एका कुटुंबाचा आठवड्याचा भाजीपाला ३०० ते ४०० रुपयांमध्ये होतो.
त्यासाठी आता आठवड्याला ५०० ते ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.
पावसाळा संपेपर्यंत ही परिस्थिती राहणार आहे.
पावसाळ्यात पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक परिस्थितीमुळे
भाजीपाला लवकर खराब होतो किंवा सडतो.
आधीच उत्पादन कमी त्यात भाजीपाला खराब होत असल्याने
बाजारातील आवक कमी होते परिणामी भाव वाढतात.
सध्याच्या परिस्थितीत भाजी बाजारामध्ये बटाटे ४० रुपये किलो, वांगी ६० रुपये किलो,
टोमॅटो ८० रुपये किलो, पालक ८० रुपये किलो, घोळ, चवळी, ६० रुपये किलो,
गवार ८० रुपये किलो, चवळीच्या शेंगा ८० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो,
लसन २०९ रुपये किलो, अद्रक १६० रुपये किलो, कोथिंबीर २०० रुपये किलो,
गंगाफळ ४० रुपये किलो, फूलकोबी ८० रुपये किलो, पत्ताकोबी ६० रुपये किलो,
मेथी ८० रुपये किलो, शेपू ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो,
गिलके ८० रुपये किलो, असे पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव आहेत.
भाज्यांना पर्याय नाही आणि रोजच्या दोन वेळेच्या जेवणात भाज्या लागतातच.
त्यामुळे दर वाढले तरी नागरिकांना
दररोज पालेभाज्या व फळभाज्या विकत घ्याव्या लागत आहेत.
जांभूळ बाजारात दाखल
दरवर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी बाजारात जांभूळ या फळाचे आगमन होते.
यावर्षी सुद्धा बाजारात जांभूळ दाखल झाले आहेत.
आंबट, गोड, तुरट अशा मिश्र चवीचे जांभूळ आरोग्यासाठी फायदेकारक मानले जाते.
विशेष करून शुगरच्या रुग्णांसाठी जांभूळ फायदेकारक असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे जांभूळांना बाजारात मोठी मागणी असते.
यावर्षीही जांभूळ बाजारात दाखल होताच मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
रानभाज्यांची प्रतीक्षा
पावसाळा प्रारंभ झाल्यानंतर दरवर्षी बाजारपेठेमध्ये
विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी येतात.
या रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेकारक मानल्या जातात.
पावसाळ्याच्या दोन महिन्यातच रानभाज्या मिळतात.
त्यामुळे बरेच नागरिक ह्या रानभाज्या खरेदी करतात.
अकोल्यात रानभाज्यांचा महोत्सव सुद्धा साजरा केला जातो.
पावसाळा प्रारंभ झाल्याने आता अनेक नागरिक या रानभाज्यांची प्रतीक्षा करीत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/550-haj-pilgrims-die-due-to-heat-temperature-in-mecca-saudi-reaches-52-degrees-celsius/