गुवाहाटीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा करत भक्कम पायाभरणी केली, तर भारताचा पहिला डाव केवळ 201 धावांवर संपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला तब्बल 288 धावांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या डावात मिळालेल्या धावांसह त्यांची एकूण आघाडी 314 धावा झाली आहे. या स्थितीत भारतावर पराभवाचे संकट गडद झाले आहे.
भारत हरल्यास WTC फायनलचं काय?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेत भारत 54.17% गुणांसह चौथ्या स्थानी आहे. पण दुसरी कसोटी हरल्यास भारताचे गुण 48.47% होतील आणि रँकिंग खाली जाऊ शकते.
Related News
भारत हरल्यास होणारे बदल:
भारत 5व्या स्थानी जाईल
पाकिस्तान 4थ्या स्थानी झेपावेल (50% गुण)
दक्षिण आफ्रिका दुसरे स्थान भक्कम करेल
या सामन्यात विजयानंतर त्यांचे गुण 75% होतील
WTC Points Table सध्याची स्थिती
1) ऑस्ट्रेलिया – 100%
2) दक्षिण आफ्रिका – 66.67%
3) श्रीलंका – 66.67%
4) भारत – 54.17%
5) पाकिस्तान – 50%
6) इंग्लंड
7) बांगलादेश
8) वेस्ट इंडिज (अजून खाते उघडले नाही)
9) न्यूझीलंड (एकही सामना खेळलेला नाही)
भारत WTC फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?
दुसरी कसोटी हरली तरीही भारतासाठी आशा संपलेली नाही.WTC सायकलमध्ये भारताचे 9 सामने शिल्लक आहेत.
फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताने काय करावं?
भारताने बाकीच्या 9 पैकी किमान 8 सामने जिंकले, तर त्यांचे गुण सुमारे 70% होतील.मागील तिन्ही फायनल पाहिल्या असता64% ते 68% गुण असलेले संघ फायनलमध्ये पोहोचले आहेत.म्हणूनच, भारताचे पुढील सामने — विशेषतः स्वदेशातील मालिका — अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
भारत सामना वाचवेल का ?
दक्षिण आफ्रिका चौथ्या दिवशी आक्रमक फलंदाजी करून मोठं लक्ष्य देण्याच्या तयारीत आहे.भारताच्या गोलंदाजांनी जलद विकेट्स घेणं,आणि फलंदाजांनी पाच दिवस टिकाव धरणंहेच कसोटी वाचवण्याचं मुख्य समीकरण आहे.भारताकडे अजून वेळ आहे, पण आता प्रत्येक सत्र जिंकणं अनिवार्य आहे.
read also : https://ajinkyabharat.com/hema-malins-video-becomes-emotional-with-folded-hands/
