गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या
अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्यावतीने
हे विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्यात या विमानतळावरून
उड्डाण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमरावती शहरात विमानतळ बांधकामास सुरवात करण्यात आली होती.
मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील कामाचा वेग मंदावला होता.
दरम्यान माजी मंत्री सुनील देशमुख यांनी
बेलोरा विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
त्यानुसार आता काम पूर्णत्वास होत आले आहे.
विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाले,
तर टर्मिनल इमारतीसह अन्य कामे सुरू आहेत.
येत्या दीड- दोन महिन्यात विमानतळाचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांपासून सुरु असलेले काम पूर्णत्वास येत असून
या विमानतळावरून देखील विमानाचे उड्डाण लवकरच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान एटीआर- ७२ किंवा
इतर विमान अमरावती विमानतळावरून टेक ऑफ करू शकतात.
त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
येथे पोलिस चौकीही बांधण्यात येणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/inspiring-work-on-childrens-rights/