वृत्तसंस्था, नवी दिल्ली : उत्तराखंडात जंगलांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. उत्तराखंडमधील आगीच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. उत्तराखंड सरकारने जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली.
त्यावेळी राज्यातील वन्यजीव असलेल्या क्षेत्रापैकी केवळ ०.१ टक्के क्षेत्र आगीत नष्ट झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून राज्यात ३९८ जंगलांना आग लागली आहे, अशी माहिती उत्तराखंड सरकारने खंडपीठास दिली. तसेच या आगी नियंत्रणात याव्यात, यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना आणि उचललेल्या पावलांची माहिती देण्यात आली.
यापैकी अनेक आगी या मानवनिर्मित असल्याचे सांगितले. या आगीसंदर्भात ३५० फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ६२ जणांचा समावेश आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. उत्तराखंडचा ४० टक्के भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे, अशी रहिवाशांची तक्रार आहे. मात्र उत्तराखंडमधील केवळ ०.१ टक्के वन्यजीव क्षेत्राला आग लागली आहे, असे वकिलांनी सांगितले. खंडपीठाने पुढील सुनावणी १५ मे रोजी ठेवली आहे.
Related News
Supreme Court Decision : व्यभिचार लपवण्यासाठी 'प्रायव्हसी'ची ढाल नाही; हॉटेल मुक्काम, कॉल रेकॉर्ड्स सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची पर...
Continue reading
बबीता पांडे बेपत्ता प्रकरण: उत्तराखंडमधील हिमालयीन पर्वतरांगांमध्ये घडलेल्या एका रहस्यमय घटनेने सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन, मोबाईल ट्रॅकिंग...
Continue reading
97% गुण मिळवणाऱ्या NEET Aspirant रियाने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटमधील 5 शब्दांनी सर्वांना रडवलं
उत्तराखंडमधील डेहराडून येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून ...
Continue reading
उत्तराखंडातील मसुरीजवळ हनीमूनसाठी गेलेल्या पुण्यातील IT कर्मचाऱ्याच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू. खोलीत रक्ताचे डाग, दोन रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि फॉ...
Continue reading
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा आगीचा कहर; नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, 6 अग्निशमन गाड्यांची धाव
दिल्ली-एनसीआर परिसरात आगीच्या घटनांचे सत्र था...
Continue reading
मोठा अनर्थ टळला! 34 प्रवाशांना वाचवण्यासाठी बस चालकानं स्वतःचा जीव गमावला; उत्तराखंडातील वीर चालकाला सलामदेहरादून : कर्तव्य, जबाबदारी आणि प्रवाश...
Continue reading
धक्कादायक! 90 वर्षीय वृद्धाचा इलेक्ट्रिक थेरेपीदरम्यान मृत्यू; 5 मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं
भोपाळ : पाठीच्या असह्य वेदनांपासून आराम मिळाव...
Continue reading
देशभरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर अखेर Supreme Court of India ने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर ...
Continue reading
नवी दिल्ली : दोन आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची परवानगी दिल्यानंतर हरीश राणा (३१) याचा अखेरचा प्रवास मंगळवारी पूर्ण झाला. गेल्या १३ ...
Continue reading