शिमला: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मोठी घोषणा केली आहे. सध्या कंगना मंडीमध्ये जोरदार प्रचार करत आहे. या मतदारसंघातून आपण निवडून येऊ, असा विश्वास तिनं व्यक्त केला. तिनं चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल मोठी घोषणाही केली.
लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यास, खासदार झाल्यास मी हळूहळू चित्रपट क्षेत्रातून बाहेर पडेन. कारण मला एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे, असं कंगनानं ‘आज तक’ वृत्तवाहिनीला सांगितलं. चित्रपट क्षेत्र आणि राजकारण यांचा समतोल कसा साधणार असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. त्यावर ‘मी चित्रपटसृष्टीतही कंटाळते. मी भूमिका साकारते. दिग्दर्शनही करते. मला राजकारणात शक्यता दिसल्यास, जनता मला उत्तम प्रतिसाद देत असल्यास, मी पूर्ण वेळ राजकारणच करेन. मी एकावेळी एकच काम करेन,’ असं उत्तर कंगनानं दिलं.
लोकांना माझी गरज असल्याचं लक्षात आल्यास मी त्याच दिशेनं जाईन. मी मंडीतून जिंकल्यास राजकारणच करेन. अनेक चित्रपट निर्मात्यांनी मला राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला. तुम्हाला लोकांच्या आशा पूर्ण कराव्या लागतात. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा फटका लोकांना बसल्यास ते योग्य होणार नाही. मी एक अतिशय उत्तम आयुष्य जगले आहे. आता मला लोकांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मी त्या संधीचं सोनं करेन. लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतील, तर त्या पूर्ण करायला हव्यात. लोकांना न्याय द्यायला हवा, असं कंगना म्हणाली.
Related News
“झुरळ” वक्तव्यावरून तरुणाईचा संताप; सोशल मीडियावर नव्या डिजिटल पक्षाची धडाकेबाज एन्ट्री
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका कथित वक्तव्यामुळे देशभरात मोठा राजकीय आणि सामाजिक ...
Continue reading
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यामुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. उत्तर प्रदेशातील...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी एक मोठी आणि चर्चेची घडामोड घडली. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी अधिकृतपणे राष्ट...
Continue reading
पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि अदानी प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक; मोदी सरकारवर केली जहरी टीका
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार
Continue reading
“राष्ट्रवादी नेमकी चालवतंय कोण?”; अतुल लोंढेंच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा रंगू लागली आहे.
Continue reading
देशभरात चर्चेत असलेल्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NE...
Continue reading
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी नाशिकमधील विविध घडामोडींवर भाष्य करत राज्य सरकार आणि भाजपवर गंभीर आरो...
Continue reading
भारतीय युवक मंद झालाय… जय श्रीराम! संजय राऊतांच्या पोस्टवर संताप; भाजपाचा जोरदार हल्लाबोल
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांन...
Continue reading
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा रंगली आहे. याला ...
Continue reading
राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्लीमध्ये के...
Continue reading
“जनतेला काटकसर शिकवणं म्हणजे अपयश मान्य करणं”; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला
मध्य पूर्वेतील वाढता तणाव, आखाती देशांमधील अस्थिर परिस्थिती आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभ...
Continue reading
चित्रपटांपेक्षा राजकीय आयुष्यात किती फरक जाणवतो, असा प्रश्न कंगनाला विचारला गेला. त्यावर फिल्मी दुनिया खोटी असल्याचं कंगना म्हणाली. ‘तिथे एक वेगळं वातावरण तयार केलं जातं. एक बबल तयार करण्यात येतं. लोकांना आकर्षित करण्यासाठी बबलची निर्मिती केली जाते. पण राजकारणात वास्तव दिसतं. समाजकार्याच्या क्षेत्रात मी नवीव आहे. राजकारणात नवी आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायचा माझा प्रयत्न असेल,’ असं कंगनानं सांगितलं.