नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे.
बारामतीत महायुतीच्या सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे असा सामना आहे. या लढाईला अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी किनार आहे.
असाच काहीसा संघर्ष उत्तर प्रदेशच्या रायबरेलीत पाहायला मिळणार होता. पण कुटुंबात संघर्ष नको.
Related News
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रश्न होता की, राष्...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
अजित पवारांच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजवरून उठलेल्या शंका; सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण राजकीय विश्व हाद...
Continue reading
बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या आरोपाने खळबळ; गुन्हा दाखल, राजकारण तापलं
अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्...
Continue reading
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भविष्यासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चांना नवीन वळण आलं आहे. राष्ट्रवादी ...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसमध्ये भूकंप – 7 नगरसेवकांचे थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांची कडक कारवाई
राज्यातील काँग्रेस पक्षात मोठी घडामोड घडली आहे. ज...
Continue reading
अजित पवारांच्या फोटोवर फुल्या, रोहित पवारांचे धक्कादायक आरोप; Ashok Kharat प्रकरण राज्यात खळबळ निर्माण करत
महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरावर खळबळ निर्माण करणारे...
Continue reading
बारामती विधानसभेच्या पोट निवडणुकीत आता बिनविरोधी रंगाचा सवाल; लक्ष्मण हाके उमेदवार बनवणार
बारामती विधानसभेची पोट निवडणूक सध्या महाराष्ट्र राजकारणात चर...
Continue reading
नवी दिल्ली: दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण राज्यात धक्का दिला. हा अपघात लीयरजेट कोसळून झाला होता आणि ...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
सुनेत्रा पवार यांच्या लेटरबॉम्बने महाराष्ट्र राजकारणात खळबळ, निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या घडामोडीने खळबळ उडवली आहे. राज्याच्या
Continue reading
कुटुंबातील गोष्टी चव्हाट्यावर यायला नको म्हणून भाजप नेते वरुण गांधींनी हा संघर्ष टाळला. विशेष म्हणजे गांधींनी निवडणूक लढावी यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही होते.
काँग्रेसकडून रायबरेलीमधून प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पिलीभीतचे खासदार आणि भाजप नेते वरुण गांधींना विनंती केली होती.
पण निवडणूक म्हणजे काही राजकीय कॉमेडी किंवा सर्कस नाही, असं गांधींनी थेट मोदींना सांगितलं आणि रायबरेलीमधून लढण्याचा प्रस्ताव नाकारला.
मलायला मनोरमानं वरुण गांधीशी याबद्दल संपर्क साधला. ‘मोदी आणि आमच्यात झालेली चर्चा उघड करणं नैतिकतेत बसत नाही,’ असं गांधींनी त्यांना सांगितलं.
पिलीभीतचे खासदार असलेल्या गांधींना भाजपनं यंदा त्या मतदारसंघातून तिकीट दिलेलं नाही.
काँग्रेस रायबरेलीतून प्रियांका गांधींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली. त्यांच्याविरोधात भाजपनं वरुण यांना तिकीट देऊ केलं.
मार्च आणि एप्रिलमध्ये मोदींनी वरुण यांच्याशी संवाद साधला. तुम्ही रायबरेलीतून लढा.
मी स्वत: तुमच्यासाठी प्रचार करेन, सभा घेईन, अशा शब्दांत मोदींनी वरुण यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण वरुण यांनी त्यांना नकार दिला.
राजकारण म्हणजे माझ्यासाठी सर्कस नाही, जिथे नातेवाईक एकमेकांविरुद्ध लढतात, असं वरुण यांनी मोदींना सांगितलं.
रायबरेलीतून निवडणूक हरलात तरीही तुमचं पुनवर्सन करू, असा शब्द मोदींनी वरुण यांना दिला. पण मोदींची ही ऑफरदेखील वरुण यांनी नाकारली.
मला काही काळ राजकारणापासून दूर राहायचं असल्याचं त्यांनी मोदींना सांगितलं. रायबरेलीतून वरुण गांधींना तिकीट दिल्यास ते चांगली लढत देऊ शकतील, असं भाजपचा अंतर्गत सर्वेक्षण अहवाल सांगतो.
त्यामुळेच गेल्या दोन आठवड्यांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरुण यांना निवडणुकीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. पण वरुण यांनी लढण्यास स्पष्ट नकार दिला.
Also Read: https://ajinkyabharat.com/assembly-elections-are-being-held-as-a-way-to-empty-the-government-treasury-sanjay-rauta/