दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंद
शरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) फक्त २० रुपयांत आरोग्य तपासणी व मोफत औषधे मिळतील या आशेने येतात. मात्र, जीएमसीतील औषध वितरण विभागाच्या कडक टायमिंग आणि मनमानी कारभारामुळे अनेक रुग्णांना औषधाऐवजी त्रास सहन करावा लागत असून, रिकाम्या हाताने परत जावे लागते. ही धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे.
जीएमसीतील ओपीडी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असते. डॉक्टरही याच वेळेत रुग्णांची तपासणी करतात. तपासणीस दोन ते तीन तास लागल्याने अनेक रुग्णांना औषध घेण्यासाठी उशीर होतो. परंतु, दुपारी नेमके २ वाजताच औषध विभागाचे गेट चपराशी बंद करून टाकतो.
८ सप्टेंबर रोजी तब्बल ४० ते ५० रुग्ण व त्यांचे नातेवाईक औषध घेण्यासाठी गेटसमोर उभे असताना चपराशीने कुणाचीही दखल न घेता गेट बंद केले. यामुळे संतप्त रुग्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आम्ही खूप दूरवरून आलो आहोत, कृपया आम्हाला औषध घेण्यासाठी गेट उघडा, अशी त्यांनी विनंती केली. मात्र, चपराशीने कोणाचेही ऐकून न घेता गेट उघडण्यास नकार दिला.
जर वेळ संपल्यानंतर गरीब रुग्णांना औषधे दिली जात नसतील, तर हा विभाग सकाळी नेमके ८ वाजताच नियमितपणे काम सुरू करतो का, हे तपासणे आवश्यक आहे. दुपारी २ नंतर मुख्य औषध विभाग बंद झाल्यानंतर अपघात कक्षातून काही औषधे दिली जातात, परंतु ती अपुरी असतात. त्यामुळे रुग्ण मुख्य औषध विभागावरच अवलंबून राहतात. मोफत औषधे न मिळाल्याने अनेकांना खाजगी मेडिकलमधून महागडी औषधे विकत घ्यावी लागत आहेत.
यामुळे जीएमसी औषध विभाग व खाजगी मेडिकल यांच्यातील साटेलोट्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या या प्रकाराची रुग्णालय प्रशासनाने तातडीने अंतर्गत चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. नव्याने रुजू झालेले अधिष्ठाता डॉ. सोनवणे यांच्यासाठी हा पहिला मोठा कसोटीचा क्षण आहे. जर त्यांनी ठोस पाऊल उचलले नाही, तर रुग्णालय प्रशासनाची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात ढासळेल. तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन जीएमसीकडून प्रत्यक्ष अहवाल मागवून, गरीब रुग्णांना न्याय मिळवून द्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
बॉक्स
या वेळी रुग्णसेवक पराग गवई यांनी तातडीने धाव घेत चपराशीला जाब विचारून गेट उघडायला भाग पाडले. यामुळे रुग्णांना अखेर औषधे मिळाली मात्र दररोज अश्या प्रकारे गरीब रुग्णांचा छळ केला जात असल्याने याची चौकशी होणे गरजेचे आहे.
Related News
मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयवतमाळ, दि. १३ : मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेले...
Continue reading
कामरगाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामरगाव :कायद्याचे दरवाजे अन्यायाविरुद्ध नेहमी खुले असतात, पोलीस हे त्याचे प्रथम संरक्षणकर्ते मानले जातात. मात्र, पोलिसांकडूनच कर्तव्यच्युत...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
शरद शेगोकारअकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती म...
Continue reading
शेतकरी–शेतमजुरांच्या सुखासाठी बाप्पाला साकडे
यवतमाळ- महाराष्ट्र हे संपन्न राज्य असूनही काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजूर चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मृद व जलस...
Continue reading
Nagpur riots: नागपूरच्या मध्यवर्ती भागात हंसापुरी, महल आणि भालदारपुरा परिसरात दंगल उसळली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारासंघाची जाणीवपूर्वक निवड केल्याच आरोपमुंबई: नागपूरच्...
Continue reading
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading
Ajit Pawar : एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकावयचा आहे.
त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. सध्या राज्यात महायुतीच सरकार आहे. भा...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे प्रमाण वाढले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची
धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता
मंत्रालयातील मुख्यम...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल...
Continue reading
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सुप आज वाजलं. तीन दिवस चाललेल्या मराठी साहित्य संमेलनात राजकीय फटकेबाजी रंगली.साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी उपमुख्यमंत्री अजित पवा...
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
READ ALSO :https://ajinkyabharat.com/32-rashtriya-vijeetya-women-khedunchaya-inspirational-pravasacha/