शरद पवारांच्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल!

शरद पवारांच्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल!

शरद पवारांच्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल!

मुंबई : विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या

धक्कादायक वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

पवार यांनी दावा केला की, “विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोक माझ्याकडे आले होते.

त्यांनी मला २८८ पैकी १८० जागा जिंकून देण्याची हमी दिली होती. मतांची फेरफार करून हे शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.”

पवारांच्या या खुलाशावर वंचित बहुजन आघाडीने जोरदार टीका केली आहे. पक्षाच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून

करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “शरद पवारजी, तुम्ही पुन्हा अर्धसत्य सांगून निघून गेलात! दोन लोकं

तुम्हाला भेटली, ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करण्याची ऑफर

दिली आणि सांगितले की, ते तुम्हाला १६० विधानसभेच्या जागा जिंकून देतील.

तुम्ही म्हणत आहात की, तुम्हाला त्यांची नावे माहित नाहीत. तर ही गोष्ट स्पष्ट करा…”

१. तुम्ही पोलिसांकडे किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? तुम्ही या दोघांविरुद्ध तक्रार केली नाही पण
तुम्ही त्यांना राहुल गांधींकडे निवडणूक हेराफेरीचा सौदा करण्यासाठी घेऊन गेलात.
२. जर तुम्हाला त्या दोघांची नावं आणि पत्ता माहीत नसेल, तर जेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या
घरात प्रवेश हा त्यांची नावे न लिहिताच झाला असेल! त्यांची नावे प्रवेश करतांना नोंदणीतून उघड होऊ शकतात.
३. तुमचे हेतू स्पष्ट नव्हते, म्हणूनच तुम्ही त्यांना राहुल गांधींकडे घेऊन गेलात. तुम्हाला माहित होते की, महाराष्ट्र विधानसभा
निवडणुकीत हेराफेरी होऊ शकते. मग तुम्ही गप्प का होता? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही इतके दिवस गप्प राहिलात?
४. राहुल गांधींनी तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात याची पुष्टी करावी.
५. राहुल गांधी वरील सर्व प्रश्नांची पुष्टी करतील का?