बोरगाव मंजू (अकोला) येथे मनीष चव्हाण या विवाहित तरुणाला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी मुर्तीजापूर तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेसह आणखी दोघांविरोधात मनीषच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच मनीषचा तपास झाला होता. विवाहानंतर त्याची ओळख एका विवाहित महिलेशी झाली.
या ओळखीचे स्वरूप वाढत गेले आणि अखेर संबंधित महिलेसह दोघांनी मिळून मनीषला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर मनीषच्या कुटुंबीयांसोबत नातेवाईक आणि समाजातील नागरिकांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/sakharam-binder-rangbhumivarchan-vadi-rhegaman/